![]() |
| फोटो स्रोत - फेसबुक |
धन्य धन्य छत्रपती शिवराय
धन्य त्यांचे सवंगडी
त्यागुनी रायबाचे लग्न
टाळले स्वराज्यावरील विघ्न
देऊनी प्राणाची आहुती
गड राखला स्वराज्यामधी
असा एक शूरवीर
नरवीर तानाजी मालुसरे...!!!
करुनी शत्रूवर वार
भगवा फडकविला गडावर
देह ठेविला भूमीवर
करीत हर हर महादेव चा गजर
स्वराज्यात गड आला
पण गड राखणारा सिंह गेला
नमन माझे त्या वीराला
नरवीर तानाजी मालुसरेला
त्याच्या त्या कर्तुत्वाला
आधी स्वराज्य मग रायबाचे लग्न
नमन त्या विचाराला
स्वराज्य प्रेम, त्यागाला
सवंगडी मैत्रीस जागला
पडता बातमी कानी
युद्धास सज्ज झाला
नमन अशा थोर मैत्रीला
विनम्र अभिवादन या शूरविराला
नरवीर तानाजी मालुसरे ला
- राहुल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी