सोमवार, २३ मार्च, २०२०

कोरोना आणि गांभीर्य

कोरोना आणि गांभीर्य

कोरोनाला पळवून लावू

     कोरोना एक राष्ट्रीय आपत्ती आहे.  चिनपासून सुरवात झाली आणि या कोरोनासुराने एक एक देश आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली संबंध जगातील देशांची आणि देशवासियांची व प्रशासनाची पळापळ चालू केली.

    सर्वजण बोलायला लागले आपल्याला जिंकायचंच आणि कोरोनाला हरवायचंच पण हरवणार कोण?
सरकार ?
प्रशासन ?
सरकारी कर्मचारी ?
डॉक्टर - वैद्यकीय कर्मचारी ?
पत्रकार ?
यांनीचं लढायचं का या कोरोनाशी?
आणि आपण मात्र शासन आदेश धुडकावून इकडे तिकडे मोक्कार फिरायचं आणि आपल्याकडे नसलेला कोरोना संसर्ग आपल्या घरी पाहुणा म्हणून आणायचा व आपल्या घरातील तसेच शेजाऱ्यांशी त्याची ओळख करून त्याला आपलं घरोबा करून ठेवायचं आणि आपण मात्र वरील या पाहुण्याशी लढणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण पाहुणे म्हणून जायचं.
खरंच जनतेने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. चीनने काय उपाययोजना करून कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. व सध्या इटली व इतर देशांची काय परिस्थिती आहे. याचा बारीक विचार करून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत. प्रशासनाला सहकार्य  मिळेल असे वागले पाहिजे. शासनाचे आदेश तंतोतंत पाळले पाहिजे ज्यामुळे ही परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल.
आज विचार केला तर काही महाभाग राजकीय विचारांवर भाष्य करून जनतेमध्ये राजकीय विचारांचे विष पेरून राजकीय विचारांचा उद्रेक करू पाहत आहे. म्हणजे आपली मानसिकता किती भुरसटलेली आहे हे आपण दाखवून देत आहोत.
रोज रोज तेच तेच सांगून आज प्रशासकीय अधिकाऱ्यांचे घसे बसू लागलेत. पण त्यांचा आवाज काही महाभागांना अजूनही ऐकू येत नाही. ते खुलेआम आजारी असताना गर्दीत फिरतात तर काही विनाकारण गर्दी करतात शासन आदेश मोडले म्हणजे आपण काही वेगळे केले या अविर्भावात मिरवतात. पण त्यांनी हे समजून घेतले.
पाहिजे शासन आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी देशहितासाठी झटत आहे. आपण फक्त आपल्या परिवारासाठी घरी बसा, गर्दीमध्ये जाऊन कोरोनाला पाहुणा म्हणून घरी घेऊन येऊ नका.

कृपया सर्वांना विंनती आहे.
     रोजची परिस्थिती पहा. ती आत्ताच आपण आटोक्यात आणू शकतो त्यासाठी फक्त शासन आदेशानुसार घरी बसुन काम करा. शासनाला सहकार्य करा.
    सर्वांनी दोन मिनिटे डोळे मिटून शांतपणे विचार करा. आजची ही परिस्थिती आपल्या एका बेजबाबदार वागण्यामुळे उद्या किती भीषण रूप धारण करेल.
काळजी घ्या,
शासन आदेश पाळा
आणि गर्दी टाळा
नाहीतर....
त्यामध्ये होरपळेल....
आपण स्वतः
आपले कुटुंब
आपले शेजारी
आपले गाव
आपला तालुका
आपला जिल्हा
आपलं राज्य
आणि आपला देश
म्हणून प्रत्येकाने स्वतः विचार करून वागा
हीच वेळ आहे आपण घरी बसून देशहितासाठी
आपल्या कुटुंबासाठी जगा

शासन आदेशानुसार आपण फक्त गर्दी न करता घरी बसून या कोरोनासुराला ठार करू शकतो.
फक्त शासन आदेश पाळा
घरीच रहा
विनाकारण गर्दी टाळा

माझ्या भारत देशाच्या सुजाण नागरीकहो आपल्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडले. त्यांचेच आपण शूरवीर वंशज आपण फक्त आता शांतता पाळून गर्दी न करता हे महामारीचे युद्ध जिंकायचंच आहे.

मी घरीच आहे.
आपणही घरीच रहा
शांतता पाळून देशहितासाठी कार्य करा....

राहुल दादा बिचकुले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...