बुधवार, २४ एप्रिल, २०१९

आठवणीतील पाने





कुठं लिहलं तुझं नाव
मला आठवतं नाय ग
आठवणींची वही उचकता
आठवण येती माझी तुला काय ग

नकळत हातांनी उचकल गेलं पान
पानाकडे पाहता बहरून गेलं मन
निळया लाल शाईनी नाव तुझं कोरलं
या वही कडं पाहता डोळ माझं भरलं

खरंच एवढं का आठवाव मी तुला
तुझी माझी भेट झाली सोडून गेली शेवटच्या वर्षाला
पण आजही आठवतात त्या आठवणी
ज्या दडवल्या मी सातपडद्याआड मनी

तुझी माझी भेट होता ग योगायोग
पण म्हणतात ना नशीबाचे कोणा ना चुकले भोग
त्यात तुझा न माझा नंबर लागला
जवळ आलो दोघे सुट्टी लागली कॉलेजला

खूप काही बोलायचं होत
प्रेमात मन तोलायच होत
बोलू ना शकलो तोलू ना शकलो
फक्त नाव तुझं वहीत मात्र लिहू शकलो

आठवतात आजही त्या आठवणी
डोळ्याच्या कडा भरत्यात पाण्यानी
कारण हेच डोळे  होते साक्षीला
जे  एकटक पाहत होते तुला

या डोळ्यांना तुझ्या डोळ्यांची समजली होती भाषा
जे सांगत होते दोघांनाही आपल्या वागण्याची दिशा
हिच दिशा मी जोखली वहीत अलगद झाकली
आज वही सापडली आठवण माझी जागी झाली


       ©  कवी राहुल बिचकुले

सोमवार, २२ एप्रिल, २०१९

मी वसुंधरा करी विनवणी जीव गुदमरतो आहे



जागा हो माणसा
माझा श्वास कोंडतो आहे
मी वसुंधरा करी विनवणी
जीव गुदमरतो आहे

ठेव दूरदृष्टी
संपतेय सृष्टी
पाठीवर भार वाढतो आहे
सिमेंटच्या जंगलाचा व्याप वाढतो आहे

तुझ्या विनारे मी जगेन
माझ्याविना तुझं अवघड जिणं
सृष्टी रक्षणाचा हा संकेत आहे
माझे रक्षण आता तुझ्याच हाती आहे

तोडली सारी वृक्ष वनराई
माझ्या जिवाची होती लाही लाही
तापमान हे वाढतच आहे
शोधा उपाय नाहीतर सजीव सृष्टी होरपळणार आहे

सजीवांमध्ये मनुष्य महान
त्यासी मिळाले बुद्धीचे वरदान
सृष्टी सारी तुच नष्ट करीत आहे
विनाशाचा नवा सापळा रचत आहे

चला आता एकी करूया
वसुंधरेला आपण वाचवुया
उपाय याला एकच आहे
वसुंधरेला हिरवा शालू दिला पाहिजे

झाडे लावु झाडे जगवु
वसुंधरेचा तोल सावरू
पाणी आडवु पाणी जिरवु
हरित वसुंधरा आपण करू

© कवी : राहुल दादा बिचकुले

आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सर्वांना विनंती आपल्याल्या जगायचं असेल तर पृथ्वीला जगवल पाहिजे. जीवसृष्टी जगवली पाहिजे. त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा. वनराई जपा जीवसृष्टी जपा. त्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा. आपल्या वसुंधरेच रक्षण करा. 

रविवार, १४ एप्रिल, २०१९

भय


भयानक....!
भीतीदायक....!
भय.....!
भुत...!
हडळ....!

       यासारखे शब्द सहज ऐकायला मिळाले तर काही वाटत नाही परंतु या शब्दांचा अर्थ प्रत्यक्ष अनुभव आल्यावर समजतो....
     मी रोज टेरेसवर झोपतो त्याचप्रमाणे त्या दिवशी ही झोपलो होतो.... खरंतर झोप येत नव्हती त्यामुळे मोबाईल हातात घेऊन मोबाईल मध्ये फोटो, व्हिडीओ, स्टेटस पाहत येरझऱ्या मारत होतो.... रात्र वाढत चालली होती.... पौर्णिमेचा चंद्र स्पष्ट दिसत होता.... आजूबाजूला कुत्र्यांच्या भूकण्याचा आवाज येत होता. मध्येच कुठलातरी पक्षी त्या आवाजाला साद देत लक्ष वेधुन घेत होता....
     मी मात्र भय, भीती, भयानक आणि भुत, हडळ यांना न मानणारा त्या आवाजामुळे मनातुन थोडा चलबिचल होऊ लागलो.... चंद्र थोडा थोडा पुढे सरकत होता... तसा मीही मनातुन घाबरुन जात होतो..... इतक्यात त्या आवाजाला नवीन साथ मिळाली .... जिन्यावरून मस्त पैंजनाचा आवाज येऊ लागला.... मी जिन्याकडे जाऊ लागलो.... तसा तो आवाज हळुहळु मंद झाला..... मी कोण आहे ? विचारताच तो पैंजनाचा छ्म छ्म आवाज थोडंस अंतर धावुन बंद झाला.... मी मात्र घाबरलो.... पुन्हा टेरेसवर जाऊन इकडे तिकडे पाहु लागलो... तर घराशेजारील रानात एक स्त्री आकृती दोन हात सरळ करून नृत्य करत असावी... तिचा एक पदर हवेत तरंगत होता.... आणि माझ्या मनात भीतीने कोलाहल माजवला होता..... कुत्र्यांच्या भुकण्याचा विव्हळण्याचा आवाज चालुच होता.. जिन्याखाली कोणीतरी नृत्य करत असावं तो पैंजनाचा आवाज येतच होता. टेरेसवरून रानात पाहता त्या स्त्रीच नृत्य चालुच होत... आणि काळोख्या राती चंद्र ढगांबरोबर लपंडाव खेळत होता. कधी मंद प्रकाश तर कधी पूर्ण अंधार... आणि माझ्या मनात भुत, भूतणी, हडळ, खविस यांचा विचार येऊन सगळेजण डोळ्यासमोर येत होते... या भीतीने घाबरून मी पटकन जाऊन अंथरुणात अंगावर घेऊन झोपलो. तरीसुद्धा ते पैंजण वाजतच होते. अंगाचा थरकाप उडाला. पूर्ण शरीर घामाने भिजुन गेले आणि मला या भीतीत कधी झोप लागली कळलच नाही...
     आता झाली खरी कहाणी सुरू..
सुंदर रमणीय रात्र त्या रात्रीत मी गार्डन मध्ये बसलेलो मस्त वाऱ्याची गार झुळुक शरीराला स्पर्श करून जात होती. मी मात्र त्याचा आनंद घेत काहीतरी गुणगुणत बाकावर रेलुन बसलेलो. थोडंस इकडं तिकडं पाहता समोरच्या उंच झाडाकडे लक्ष गेलं तो महाकाय वृक्ष उंचच उंच आणि रुंदही त्याच्या बाजुने मंद असे धुके हवेत पसरत होते त्या धुक्याचे ढग बनुन हवेत मस्त विहार करीत होते. अचानक त्या धुक्यातुन पांढरीशुभ्र अप्सरा पंख असते तर परी म्हणावी लागली असती. हळुहळु पुढे येत होती पायी पैंजण छ्म छ्म आवाज करत होते. खरच ते रूप पाहुन भले भले मोहित होतील त्यात मी मोहित झालो हे कोणतं अजब. मी तिच्याकडे पाहत होतो ती पुढेपुढे येत होती. तीच सुंदर रूप मी न्याहाळत होतो.. सुंदर कमनीय बांधा... व्वा! व्वा! तेजोमय कांती... लाजवाब! गुलाबी ओठ... अप्रतिम! पैंजणाची छ्म छ्म... मधुर! ती जवळ येत होती आणि मी तिच्याकडे पाहतच होतो. डोळे जणु मीनाक्षी.. सौंदर्य रंभा मेनका जणु उर्वशी... ती जवळ आली शेजारी बसली तशी चांदण्यांची चमचम चालु झाली... त्यामध्ये ती आणखीच सुंदर दिसु लागली... तिचा हात माझ्या चेहऱ्यावरून फिरवु लागली जणु मोरपंख फिरतोय असा भास होऊ लागला.. मी रोमांचित होऊन डोळे झाकले तसा तिने माझा गळा पकडला. तिचा कर्णकर्कश आवाज खडबडीत हात आणि रक्ताळलेला चेहरा आणि हवेत उडत असलेली तिची पांढरी शुभ्र कपडे... यांनी मला राम राम राम राम म्हणण्यास भाग पाडले.. आणि मी जागा झालो...
     पुर्ण शरीर घामाने ओले झालेले तोंडातून आवाज निघेना अशी माझी अवस्था झाली होती आणि भय आणि भयानक, भुत आणि हडळ यांनी मला त्यांचं रूप दाखवलं... तसाच उठुन जिना उतरू लागलो सहज रानात पाहिलं तर एक बुजगावणं आणि त्यावर एक कापड फडफडत होतं. जरा मनात धीर आला आणि जिना उतरून खाली आलो तर  घरात पुन्हा रात्रीच्या पैंजनांचा आवाज आला म्हणुन घरात गेलो तर मांजराच्या गळ्यात ताईने बांधलेले पैंजण होते. मी मात्र पाहत राहिलो. आणि भय, भयानक, भुत आणि हडळ या शब्दांचा अनुभव काय असतो याचा विचार करू लागलो..

भुत हडळ आणि खविस
यावर जरी नसला विश्वास
जो होतो मनाला भास
तेच कारण भयास..

© लेखक राहुल दादा बिचकुले

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

काय सांगू सखे तुला





काय बोलु सखे तुला
काय बोलु सखे तुला
काही समजेना ग मला
हृदयी धकधक होते पाहता तुला

तुला मी पाहिलं
तुझ्याशी मी बोललो
तेव्हापासून काय झालं मला
विसरलो मीच ग स्वताला

तुला पहिल्यापासून
नजर माझी स्थिर झाली
काय सांगू सखे तुला
भुलली नजर तुझ्या ग सौंदर्याला

आधी कसं
सगळ काही ठीक होत
आता हृद्य धडधडत
झोप येत नाही ग मला

काय म्हणे प्रेम झालं
प्रेम झालं म्हणे मला
पण हृदयी धीर कुठे माझ्या
हे सार सांगीन मी तुला

एक दिवस आला
बोलण्याचा निश्चय मी केला
तुझ्याशी काय बोलावं
या विचारात आठवडा ग गेला

तुला भेटण्यासाठी सखे
एक कागद मी लिहला
त्या कागदावरी उतरविला
भाव माझ्या मनातला

मनी धीर करून
कागद तुझ्या हाती दिला
कागद पाहता तु
होकार मला दिला

काय आनंद झाला मला
हृदयी झुले प्रेमाचा झुला
काय सांगु सखे तुला
तु मिळाली मला



© कवी : राहुल दादा बिचकुले

शनिवार, ६ एप्रिल, २०१९

नववर्षाची लागली चाहुल
चैत्र पालवी टाकते पाऊल
चला दारी गुढी उभारूया
नवा संकल्प मनी करूया
कलश प्रतीक मांगल्याचे
करू संवर्धन संस्कृतीचे
प्रतीक महान लिंब डहाळी
निसर्ग संवर्धनाची देऊ आरोळी
रोगराईची उपटु मुळी
गोड साखरेची बांधुन गाठी
एकत्र येऊनी करू क्रांती मोठी
भक्तीने करूया शालू अर्पण
स्त्री शक्तीचा करू सन्मान
गुढी उभारण्या उंच काठी
प्रयत्न करूया जनहितासाठी
करूया पूजा गंध अक्षता वाहुन
निसर्ग रक्षणाची गुढी उभारून
हाच संकल्प मनी धरा
या वर्षात सर्वांनी वृक्षारोपण करा
झाडे तोडुनी, प्रदूषण वाढवुनी
काय कोणी मिळविले ?
पुर, दुष्काळ, वादळात
सर्वस्व गमाविले....!!!
थांबवुया हे सारे आपण
करुनी पुन्हा वृक्षारोपण
झाडे लावु झाडे जगवु
वसुंधरेला पुन्हा सजवू
पर्यावरणाच्या गुढीसंगे
करू नववर्षाचे स्वागत

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक / कवी : राहुल दादा बिचकुले

गुढी विचारांची





नववर्षाची लागली चाहुल
चैत्र पालवी टाकते पाऊल
चला दारी गुढी उभारूया
नवा संकल्प मनी करूया
कलश प्रतीक मांगल्याचे
करू संवर्धन संस्कृतीचे
प्रतीक महान लिंब डहाळी
निसर्ग संवर्धनाची देऊ आरोळी
रोगराईची उपटु मुळी
गोड साखरेची बांधुन गाठी
एकत्र येऊनी करू क्रांती मोठी
भक्तीने करूया शालू अर्पण
स्त्री शक्तीचा करू सन्मान
गुढी उभारण्या उंच काठी
प्रयत्न करूया जनहितासाठी
करूया पूजा गंध अक्षता वाहुन
निसर्ग रक्षणाची गुढी उभारून
हाच संकल्प मनी धरा
या वर्षात सर्वांनी वृक्षारोपण करा
झाडे तोडुनी, प्रदूषण वाढवुनी
काय कोणी मिळविले ?
पुर, दुष्काळ, वादळात
सर्वस्व गमाविले....!!!
थांबवुया हे सारे आपण
करुनी पुन्हा वृक्षारोपण
झाडे लावु झाडे जगवु
वसुंधरेला पुन्हा सजवू
पर्यावरणाच्या गुढीसंगे
करू नववर्षाचे स्वागत

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक / कवी : राहुल दादा बिचकुले

गुढीपाडवा






झाडे तोडुनी, प्रदूषण वाढवुनी
काय कोणी मिळविले ?
पुर, दुष्काळ, वादळात
सर्वस्व गमाविले....!!!
थांबवुया हे सारे आपण
करुनी पुन्हा वृक्षारोपण
झाडे लावु झाडे जगवु
वसुंधरेला पुन्हा सजवू
पर्यावरणाच्या गुढीसंगे
करू नववर्षाचे स्वागत

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक / कवी : राहुल दादा बिचकुले

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...