शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

दुर्मिळ होत चाललेल्या लोकसंस्कृतीचा वारसा आजही जपला जातोय.. वासुदेव

 उत्पन्नाचे साधन म्हणुन नाही तर आमची परंपरा म्हणुन आम्ही या कलेकडे पाहतोय. : संतोष रायभान कोंडे ( वासुदेव )

 थंडीचे दिवस आहे सकाळची साखरझोप यामध्येच कानावर टाळ चिपळीचा सुंदर आवाज आणि वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पहारी हरीनाम बोला. हे सुंदर गीत ऐकू आले आणि दाराबाहेर सुंदर विविध रंगी पोशाखात डोक्यावर मोरपिसाची टोपी गळ्यामध्ये वेगवेगळ्या माळा घातलेली वासुदेवाची स्वारी नाचत नाचत चाललेली पाहायला मिळाली.
      पण आता हि लोककला लोप पावत चाललेली आहे. आणि लोककलावंत दुर्मिळ होत आहे. आजपर्यंत वारसा आणि संस्कृती म्हणुन आपण याकडे पाहत आलो आहे. परंतु आता या लोककलेच्या माध्यमातून पोट भरणं अवघड आहे त्यामुळे यामध्ये असणारा वासुदेव समाज नोकरी व्यवसाय करू लागला आणि या लोक कलेपासून अलिप्त होऊ लागला आहे. पूर्वी आपण पाहत असलेले पिंगळा, वासुदेव, ज्योतिषी, हेळवी, साधु संतांच्या पोलिसाच्या वेशातील बहुरूपी, नंदीबैल, कडक लक्ष्मी असे अनेक लोककलावंत आता दुर्मिळ होत चाललेले आहे. कारण या कलेच्या माध्यमातुन आता पोट भरणे अवघड होत चालले आहे.



      वासुदेव हि लोकसंस्कृती जपणारे संतोष कोंडे हे आजही आपली हि लोककला जपत आहे. ते म्हणतात उत्पन्नाचे साधन म्हणुन नाही तर आमची परंपरा म्हणुन आम्ही या कलेकडे पाहतोय. कारण आता नाही जपली तर पुढे हा वारसा संपुष्टात येईल. पूर्वी लोकं धार्मिक वृत्तीने आमच्याकडे पाहून दानधर्म करत होते परंतु आता आम्ही दिसताच काही आमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी आम्ही येताच सर्व समाज अवतीभवती गोळा व्हायचा. आता आम्ही आमचा वारसा म्हणुन गावोगावी फिरत असतो रस्त्याने जात असताना कोणी दानधर्म केला तर घेतो नाहीतर आपली संस्कृती परंपरा जपत पुढे जातो. आज आमचे अनेकजण आपला नोकरी व्यवसाय सांभाळत आपला हा वारसा जपत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली हि लोककला आजही आम्ही अभिमानाने एक वारसा म्हणुन जपत आहे.

      आपल्या संस्कृतीची शोभा असणाऱ्या अनेक लोककला या जपल्या गेल्या पाहिजेत आपल्या पूर्वजांनी पाहिलेल्या लोककला आपण कित्येक पहिल्यात आणि आपण पाहिलेल्या लोककला आपली पुढची पिढी किती पाहिल हे आता सांगता येणार नाही. कारण या लोककलेला लोकाश्रय नाही मिळाला तर त्या संपुष्टात येईल आणि आपल्या भारतीय संस्कृतीतील असणारी दानधर्माची परंपराही हि इथेच लोप पावेल. पुढच्या पिढीकडे जाणारी हि धार्मिक परंपरा कमी कमी होत जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...