सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

जंगली श्वापदे मानववस्तीत हि तर धोक्याची घंटा !


आजची बातमी वाचली आणि विचार करण्याची क्षमता सुन्न झाली. बिबट्या बनला नरभक्षक ! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू हि आपल्या जवळची बातमी वाचताच अंगावर शहारा आला परंतु आपल्या आसपास हि अशा अनेक घटना रोज घडत चालल्या आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या सभोवताली रानगव्याचा मानववस्तीत शिरकाव, बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी पशुधनाचे नुकसान, रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, तरसाच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू, रस्त्यावर रात्री वाघ दिसला. अशा अनेक बातम्या आपण वाचत आहे. जेथे घटना घडत आहे. तेथे थोडीफार जागरूकता आणि भीती निर्माण होत आहे. परंतु वेळ निघुन गेल्यावर पुन्हा पहिलेच दिवस. 
खरतर जंगली प्राणी मानववस्तीत आले याचे कारण शोधणे गरजेचे आहे आणि त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये सरकारी स्तरावर विशेष अंमलबजावणी करून वनविभागाकडे विशेष जबाबदारी सोपवून सामान्य नागरिकांना या विषयावर जन जागृती करून काहीतरी करणे आवश्यक आहे. यामध्ये असणारे तज्ञ अभ्यासक यांचे या ठिकाणी मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. वनविभागातील अनुभवी कर्मचारी यांचीही यामध्ये मदत घेऊन यावर काय करता येईल याचा विचार करून काहीतरी करायला पाहिजे नाहीतर हि जंगली श्वापदे जंगल राहिले नसल्यामुळे मानववस्तीत येणार शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान करणार, नाही काही मिळाल्यास किंवा त्यांच्या नजरेच्या अंदाजामध्ये मानवी सावज आल्यास ते माणसावरही भीती पोटी किंवा भुकेपोटी हल्ला करणार हे होणारच आहे. म्हणुन सावध व्हायला हवे कारण हि तर धोक्याची घंटा आहे.

जंगल संपलं ते राहिलं फक्त चित्रात आणि प्राणीही दुर्मिळ झाले परंतु ज्या प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतीचा आणि ओढ्या नाल्याचा, गायरानांचा आधार घेतला ते प्राणी आज मानववस्तीत आपल्या भुकेची गरज भागवण्यासाठी येऊ लागले आहेत. याला कारणही माणुस आहे. आपले एखाद्याने घर उध्वस्त केल्यास आपण सुडापोटी दुसऱ्याचे घर उध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करतो परंतु प्राणी त्यांचे आपण संपवलेले जंगल (घर) आणि त्यामुळे त्यांची होत असलेली उपासमार म्हणजे तो फक्त आणि फक्त पोटाची भुक भागवण्यासाठी माणसाच्या वस्तीत येत आहे येथे त्याची भुक कारण आहे. माणसासी कुठलं वैर नाही. जंगल गेलं छोटे मोठे जंगली प्राणी यांची संख्याही कमी झाली. त्यामुळे या मांसाहारी जंगली प्राण्यांचे मुख्य अन्न संपुष्टात आले. त्यामुळे त्यांचा भूकेपोटी मानवी वस्तीत शिरकाव सुरु झाला आणि तो सातत्याने वाढत चालला आहे. त्यामुळे यावर विचार व्हायला हवे प्रत्येकाने प्रयत्न करून छोटी मोठी जंगले निर्माण केली पाहिजे नाहीतर उद्याचा काळ आणि वेळ यामध्ये माणुस सुरक्षित असेल असे वाटत नाही. 
सरकारने यावर विशेष मोहीम राबवावी अनुभवी वनविभाग कर्मचारी यांची मदत घ्यावी. सामाजिक संस्था यांनाही याच्या जोडीला घेऊन यावर उपाययोजना करण्याची तयारी करावी. यामध्ये जनतेने या कार्याला सहकार्य करावे. त्यामुळे जंगली प्राण्यांचा हिरावून घेतलेला आदीवास पुन्हा निर्माण व्हायला हवा. तेव्हाच हा जंगली प्राण्यांचा वाढत चाललेला शिरकाव आटोक्यात येऊ शकतो असे मला वाटते परंतु यावर या क्षेत्रातील तज्ञ अभ्यासकांनी व्यक्त व्हायला हवे आणि त्याचे सार्वत्रिक प्रसारण प्रसार माध्यमांच्या सहाय्याने करायला हवे. यामध्ये जंगली प्राणी मानव वस्तीत आल्यास घ्यावयाची काळजी तसेच त्याला मानव वस्तीतून दूर पाठवण्यासाठी काही उपाययोजना याचीही जनजागृती व्हायला हवी नाहीतर विनाकारण गरीब शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या कुटुंबाची वाताहत निर्माण होईल कारण हि तर धोक्याची घंटा आहे म्हणुन सावध व्हायला हवे.

माणसानं जंगल उध्वस्त केलं म्हणुन माणसाशी वैर नसुन जंगली प्राणी आपल्या पोटाची भुक भगवण्यासाठी मानववस्तीमध्ये येतात. यावर काहीतरी उपाययोजना व्हायला हव्यात नाहीतर गरीब शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबाची वाताहत होईल. 
राहुल बिचकुले - पत्रकार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...