कल्पवृक्ष भाग पाच
विजय सम्राट विजय नगरात पोहचताच नगरात दवंडी
पिटतो. व सर्वत्र वृक्षलागवड करण्यात यावी. पशु पक्षांना आसरा देण्यात यावा. व
आपल्या विजय नगरात एक जंगल तयार करण्यात यावे असे फर्मान काढतो. सर्व प्रजा,
मंत्रीमंडळ, खुद्द राजा व राजकन्या या वृक्षलागवड चळवळीत सहभागी होतात. जंगलाची
जागा राखली जाते. तेथे एक मंदिर उभारून ते वन देवाच्या नावाने देवराई म्हणुन राखले
जाते. या वनाला कुणीही हानी पोहचवायची नाही. याचे संगोपन करायचे व यातुन मिळणारी
वनसंपती फळे, फुले, औषधी वनस्पती यांचा व्यापार करायचा असा नियम केला जातो.
विजयनगरला एक खलिता येतो....
मी वनराई नगरचा राजा सम्राट देवराय आपल्या वन
निर्मितीच्या कार्याने खुश आहे. व माझ्या राज्याची महाराणी म्हणुन मी आपल्या
कन्येचा स्वीकार करण्यासाठी येत आहे.
संपूर्ण विजय नगरमध्ये आनंदाचे
वातावरण होते. सम्राट देवराय च्या स्वागताची तयारी करण्यात येते. विजय नगरच्या
प्रवेशद्वारापाशी सम्राट विजय राजकन्या विजया आणि मंत्रिमंडळ व सर्व प्रजा वाट
पाहत असतात. दुरूनच वनराई नगरचा ध्वज दिसु लागतो. सगळीकडे वाद्यांचा आवाज घुमू
लागतो. मोठ्या उत्साहात सम्राट देवरायचे स्वागत होते. सम्राट देवराय व राजकन्या
विजया यांच्या लग्नाची तयारी होते. मोठ्या उत्साहात त्यांचा विवाह लावुन दिला
जातो. व हुंडा म्हणुन सोने नाणे दिले जाते.
तेव्हा देवराय विजय सम्राटशी बोलतो. माझ्या
राज्यात माझी देवराई, वृक्ष, वेली, पशु, पक्षी हेच माझं सोन आहे त्यामुळे द्यायचे असेल
तर भेट म्हणुन वृक्ष वेली द्या.
तेव्हा विजय सम्राट आपल्या
राज्यातील रोपवाटिकेतुन अनेक वृक्ष भेट म्हणुन देतात. व आनंदाने पाठवणी करतात.
राजकन्या विजया आनंदाने सम्राट
देवराय सोबत जाण्यास निघते.
वनराई नगरच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होताच. विविध वाद्य वाजू लागतात. नव्या
महाराणीचे व सम्राट देवरायांचे स्वागत होते. संपुर्ण नगरात पाठवणी सोबत आलेली रोपे
वाटली जातात. आणि रथ राजमहालाची वाट चुकवत जंगलाच्या दिशेने घेण्यास सम्राट देवराय
सांगतात. सोबत मंत्रीमंडळ व प्रजा ही असते. रथ जंगलातुन तळ्याकाठी येऊन थांबतो.
सम्राट देवराय त्या कल्पवृक्षाच्या झाडाला कडकडून मिठी मारतो. डोळ्यातुन अश्रू
धारा येतात.
तेव्हा विजया प्रश्न विचारते.
तुम्ही या झाडाला मिठी का मारली ?
तेव्हा देवराय विजया बरोबर सर्व प्रजेला सांगतो.
हि ती देवता आहे. जिने हे जंगल घडवले,
एका आजीचे वचन पुर्ण केले, एका सामान्य मुलाला राजा केले, आणि विस्थापित झालेल्या नगरवाशीयांना
पुन्हा आपल्या राज्यात आणले. व एक नवे राज्य निर्माण केले. हाच तो कल्पवृक्ष
ज्याने आजवर मला माझ्या कार्यात मदत केली. माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. आता तुम्हीही
या वृक्षाची पूजा करा व वन रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या.
सम्राट देवराय व राणी विजया
कल्पवृक्षाची पुजा करतात. व वृक्षातून आवाज सम्राट देवराय तुझे कार्य महान आहे.
आणि पुढेही असेच चालु ठेव. जर निसर्ग जपला तर तोही तुम्हाला जपेल. आणि निसर्गाला
हानी पोहचवाल तर तोही तुमच्यावर कोपेल. आता माझे कार्य संपले. आता तुम्हीच
अंतर्मनातील शुद्ध विचाराची ज्योत पेटवा व
कार्य करा. तुमच्या मनाला जे चांगले वाटेल ते करा. निसर्ग संवर्धन करा. पशु
पक्षांना आसरा द्या. तुम्ही सर्व सुखी होताल. आणि आवाज बंद होतो.
सम्राट देवरायाच्या डोळ्यात पाणी
येते. आणि एक घोषणा करतो. या कल्पवृक्षाच्या शेजारी एक वनदेवीचे मंदिर बांधण्याची.
मंदिराचे काम पुर्ण होते. राजा - प्रजा
सर्व वनदेवीची पूजा करतात. उत्सव म्हणुन आपल्या राज्याबरोबर शेजारील राज्यातही
वृक्ष लागवडीची चळवळ उभी करतात. आणि सम्राट देवराय राणी विजया आणि वनराई नगरची
प्रजा या वनराई नगरात सुखाने राहतात. आणि उगवत्या सूर्याच्या प्रतिमेच्या मध्ये
कल्पवृक्ष हा ध्वज “निसर्ग संवर्धन करा ती काळाची गरज आहे” हा संदेश देत अखंड वनराई
नगरच्या राजमहालावर व वनदेवीच्या मंदिरावर व या वनराई नगरात फिरायला जाणाऱ्या
प्रत्येक माणसाच्या मनात फडकत आहे.
तात्पर्य :- मन हेच कल्पवृक्ष आहे. शुद्ध मनाने घेतलेले निर्णय आमलात आणा
तेव्हा काहीतरी चांगले घडेल. निसर्ग संवर्धन करा ती बदलत्या काळाची गरज आहे.
लेखक : राहुल दादा बिचकुले
मो. ८८८८८९७५३३ .
कथा आवडल्यास आवर्जुन प्रतिसाद द्या......
धन्यवाद !!!




