कल्पवृक्ष भाग एक
वनराई नगर नावाच एक गाव होते. त्या गावातील लोक खुप देवभोळे होते. त्यांनी देवाच्या
नावाने एक जंगल राखले होते. हि देवराई खुप मोठी होती कि या देवराई मुळे संपूर्ण गावातील लोकांना अन्नाची कधीही कमतरता
भासत नव्हती. गावातील लोकही खुप श्रद्धेने या देवराईचे रक्षण करत ते कधीही या देवराईतील वृक्ष तोडत
नसत. या जंगलातून मिळणारी फळे, फुले, औषधी वनस्पती पासून औषधे व वाळलेल्या
फांद्यापासून इंधन म्हणून लाकूड मिळत असे त्याचा उपयोग करून संपूर्ण गावकरी आपला
उदर निर्वाह करत असे. एके दिवशी एका लाकूड तोड्याची नजर या जंगलावर पडली व
त्याच्या मनात विचार आला कि आपण या जंगलातील झाडे तोडली तर आपल्याला लाकडासाठी
दूरवर जावे लागणार नाही. असा विचार करून लाकूडतोड्याने झाड तोडले. व ते विकुन
त्याने भरपुर पैसे कमावले हे गावातील लोकांनी पाहीले. व त्या लाकुड तोड्याची भेट
घेतली व त्याला विचारले तु या जंगलातील झाड तोडले तेव्हा तुला भीती वाटली नाही का
? यावर लाकुड तोड्याने उत्तर दिले कि, नाही ! त्यामुळे गावातील लोकांच्या मनामध्ये
पैश्यामुळे मोह निर्माण झाला व त्यांच्याही मनामध्ये झाडे तोडुन पैसे कमावण्याचा
विचार आला. व त्यांनी झाडे तोडण्यास सुरुवात केली. त्यांनी काही दिवस झाडे तोडली.
पावसाळ्याचे दिवस आले. सर्वांना पावसाची आतुरता लागली. पण या जंगलातील झाडे
तोडल्यामुळे वातावरण बदलुन गेले. पाऊस पडेनासा झाला. त्यामुळे जंगल वाळून जाऊ
लागले लोकांना जंगलातून मिळणारे उत्पन्न कमी झाले लोकांना अन्नाची कमतरता जाणवु
लागली पाणीही कमी पडू लागले लोक इकडे तिकडे भटकू लागले व अन्न पाण्यासाठी गाव
सोडुन जाऊ लागले. सर्व गावकर्यांनी हळूहळू गाव सोडले. परंतु एका वयोवृद्ध आजीने
तिच्या एका लहान नातवासह गावातच राहण्याचा निर्णय घेतला.
या भकास, भयाण, गावात आजी आपल्या
नातवासह राहु लागली. नातु हा जंगलातील वाळलेली फळे गोळा करून आणत व त्यावर आजीचा व
नातवाचा उदर निर्वाह होऊ लागला या फळाच्या शोधामुळे या नातवाने संपूर्ण पाहीले.
तेव्हा त्याला या जंगलात छोटेसे तळे दिसले व त्या काठावर एक छोटेसे झाड
उगवून आलेले दिसले. ते झाड हिरवे असल्याचे पाहुन व तळ्यात पाणी असलेले पाहुन त्या
मुलाला आश्चर्य वाटले व त्याने घरी जावून हे सर्व काही आपल्या आजीला सांगितले
त्यावर आजीने उत्तर दिले कि, बाळा ‘देव तारी त्याला कोण मारी’ ! आजी म्हणाली. देव
कोणाला उपाशी मरून देणार नाही! तु आजपासुन रोज त्या तळ्यावर पाणी आणण्यासाठी
जायचे. आणि त्या लहान झाडाची काळजी घ्यायची हे जंगल पहिल्यासारखे करण्याची
जबाबदारी आता तुझी तु सांभाळशील ना या जंगलाला ? हो आजी ! मीच हे जंगल पुन्हा तयार
करणार ! मुलगा म्हणाला.
मुलगा नित्यनेमाने त्या तळ्यावर
पाणी आणण्यासाठी जाऊ लागला. व त्या झाडाची काळजी घेऊ लागला झाडही मोठे होऊ लागले व
त्याबरोबर मुलगाही मोठा होऊ लागला. मुलगा समजदार झाला. त्याच्या वयोवृद्ध आजीने
त्याच्याकडे एक वचन मागितले. ‘तु हे जंगल निर्माण करून त्याचे रक्षण करशील कारण
याने बऱ्याच लोकांना लहानाचे मोठे केले. त्यांचा सांभाळ केला आणि त्यांना जगवले’.
परंतु ‘स्वार्थी लोकांनी आपल्या मोहापायी हे जंगल नष्ट केले’. पण तु हे करू नको!
तु हे जंगल निर्माण करशील ना ? यावर मुलाने आजीला वचन दिले कि मी हे जंगल निर्माण
करील ! आणि आजीने प्राण सोडला. मुलाने दुख विरहात न बुडता आजीच्या त्या वचनाची
जाणीव मनात ठेऊन कार्यास सुरुवात केली. तो जाऊन त्या तळ्याच्या काठावर झोपडी
बांधुन राहु लागला. रोज नित्यनेमाने झाडाची देखभाल करू लागला व मनात रोज जंगल वाढवण्याचा विचार करू लागला.
दिवसामागून दिवस जावू लागले. आजीचे वचन त्याच्या मनाला सतावू लागले. त्याला जंगल
वाढवण्याची कल्पनाच सुचेना त्याला दिवस रात्र झोप लागेना. मनाची अस्वस्थता वाढू
लागली कारण संपूर्ण जंगलात फक्त एक तळ्याकाठचे झाड हिरवे होते. एक दिवस त्या
झाडाची निगराणी करत असताना तो अस्वस्थ मनाने त्या झाडाखाली बसला. आणि तेवढ्यात एक
चमत्कार झाला. झाड त्याला बोलु लागले. असा निराश का झालास? तु या जंगलाचा राजा
आहे. मुलगा घाबरला या वाळलेल्या भयाण जंगलात कोण बोलत आहे मला. असा विचार करत
आजूबाजूला पाहू लागला. हे पाहुन झाड पुन्हा त्याला म्हणाले घाबरू नकोस ! मी आहे.
तेव्हा मुलाने झाडाकडे पाहीले. व त्याने आश्चर्याने तोंडात बोटेच घातली. त्यावर
झाड म्हणाले. आश्चर्य वाटून घेऊ नकोस मी तुझ्याच मदतीसाठी या जंगलात उदयास आलो
आहे. मी “कल्पवृक्ष” आहे!. तु मला जे मागशील ते मी तुला देईल. पण स्वार्थी बनू
नको. कारण या स्वार्थाची मुळे संकटाच्या जमीनीत रुतलेली असतात. स्वार्थ बाळगून
संकट ओढवुन घेऊ नकोस. तुझे भाऊबंद हे पैश्याच्या मोहापायी व मोठे होण्याच्या
स्वार्थापायी संकटात सापडले व हि अवस्था बनवून घेतली. तुला राजा व्हायचे असेल तर
स्वार्थी बनू नको.
हे कल्पवृक्षा ! संकटाचा सामना करण्याचे
व निस्वार्थीपणाने काम करण्याचे संस्कार माल माझ्या आजीने शिकविले आहेत. व संस्कार
हे असे असतात. ते वेळोवेळी आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतात. मला तुझी साथ जरी
लाभली नसती तरी मी माझे कर्तव्य व आजीचे वचन विसरलो नसतो! पण ?
पण काय ?
हे कल्पवृक्षा मी निराश झालो होतो. मी आता तुला फक्त हेच मागतो कि मी या
जंगलाची पुन्हा निर्मिती करील. असे काही सांग...
तु मला तुझी इच्छा सांगितली, तर तु असे कर या जंगलातील सर्व प्रकारची फळे गोळा
कर व फळे गोळा करून टी फोडुन घे व पुन्हा माझी भेट घे.
क्रमश ......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी