मंगळवार, ३० जुलै, २०१९

कल्पवृक्ष कथा भाग ३

कल्पवृक्ष भाग तीन 





पण काय ? कल्पवृक्षा !
    अरे तिला आपली करून घेणे म्हणजे लग्न करणे. आणि लग्न करत असताना हा पण ठेवायचा कि, मुलीकडून हुंडा म्हणुन सोने नाणे, दागदागिने घ्यायचे नाही फक्त आपल्या जंगलाएवढे मोठे जंगल निर्माण करून त्याचे रक्षण करण्यास सांगायचे. कारण राजाची कन्या फार लाडकी आहे, राजा तिच्यासाठी काहीही करू शकतो.
    ठिक आहे ! जंगलचा राजा तयारीला लागला त्याने राजमहाल अतिशय सुंदर पद्धतीने सजवला. राजमहालासमोर अलिशान बगीचा, सुंदर छोटे तळे, तळ्यात सुंदर कमळे, सुंदर राजहंसाचा मुक्त विहार, सर्व पशुपक्षांचा मुक्त वावर सुंदर असा राजमहाल तयार झाला. व मनात त्या राजकन्येचा विचार करू लागला.
    राजकन्याही आपल्या महाली गेली व जंगलच्या राजाचा विचार करू लागली. तिला सतत तो राजमहाल व तो राजा दिसत होता. राजकन्येला ती आठवण सतावू लागली. राजाही तिच्या येण्याची वाट पाहू लागला त्याला विश्वास होता कि, राजकन्या एकदा तरी येईल म्हणुन जंगलच्या राजाने राजमहाल अतिशय सुंदर पद्धतीने सजवला.
    राजकन्येलाही राजाच्या भेटीची ओढ लागली त्यामुळे ती एक दिवस दासीला सोबत घेऊन त्या राजमहालाकडे निघाली. राजमहालाजवळ येताच तिचे लक्ष राजमहालाच्या प्रवेशद्वारावर गेले. अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेले प्रवेशद्वार व राजमहाल पाहुन तिला खुप आनंद झाला. आणि प्रवेशद्वाराजवळ वाट पाहत असलेला राजा तिला दिसला. मनात आनंद झाला नजरेला नजर भिडली व तिला जाणीव झाली कि, राजाला सुद्धा आपल्या भेटीची ओढ लागली आहे. राजकन्येला भेटीची ओढ लागली होती म्हणुन राजकन्या विचार करू लागली कि, तिने त्या जंगलच्या राजाजवळ जावून विचारले कि, तुम्ही या जंगलाचे राजा आहात का ? हा राजमहाल तुमचा आहे का ?
    होय ! राजमहाल माझा आहे. व मी या जंगलाचा राजा जंगलातील पशु पक्षी माझी प्रजा आहे. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. पण तुम्ही कोण?
    मी ! शेजारच्या विजयनगरच्या राजाची कन्या विजया आहे. माझ्या वडिलांचे नगर खुप मोठे आहे. परंतु तेथे एवढे मोठे जंगल नाही. म्हणुन आम्ही या जंगलाच्या दिशेने आलो होतो. आणि हे सुंदर जंगल आवडले आणि अधून मधुन येतच राहिलो. आम्ही महालात येऊ शकतो का ?
    का नाही ? राजा म्हणाला.
    राजकन्या विजया आपल्या मैत्रिणींना बरोबर घेऊन राजाबरोबर राजमहालात प्रवेश करतात. व सुंदर राजमहाल पाहुन आनंदीत होतात. विजया विचारते. तुम्ही येथे एकटेच असता ?
    नाही ! मी एकटा नाही येथील पशुपक्षी माझ्याबरोबर असतात.
तसे नाही, कि येथे कोणी मनुष्य राहत नाही का?
आता नाही, पूर्वी होते!
पुर्वी !
होय पुर्वी ! येथे एक नगर होते. व असेच सुंदर जंगल या नगरातील लोक खुप चांगले व श्रद्धाळू होते. पण पैशाच्या मोहापायी त्यांनी जंगल तोडुन संकट ओढावून घेतले.दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर नगर सोडुन गेले. पण माझी आजी दुष्काळाला न घाबरता येथे मला घेऊन राहिली व मला संकटात जगायला शिकवुन देवाघरी गेली. नंतर मी हे जंगल निर्माण केले व जंगलाचे रक्षणही करण्याची जबाबदारी माझ्याकडे घेतली. कारण जंगल हा एक निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते. तुमच्या विजय नगरचे साम्राज्य खुप मोठे असेल ना ?
    होय माझे वडील विजय सम्राट यांचे राज्य खुप मोठे आहे. परंतु आमच्या विजय नगरात असे मोठे जंगल नाही.
    परंतु विजय सम्राट जंगल निर्माण करू शकतील ना ?
    होय ! माझे वडील फार जिद्दी आहेत.
    विजया ! तुम्हाला या जंगलात राहायला आवडेल का ? या जंगलची राणी म्हणुन !
असेच बोलता बोलता राजा त्या राजकन्येला आपले प्रेम व्यक्त करून दाखवतो.  
    राजकन्या विजया विचार करत...... माझी प्रेमाला समंती आहे. पण ?
    पण काय ? राजकुमार विचारतो.
    मी विजयनगरची राजकन्या मैत्रिणीच्या सहवासात वाढलेली. आजुबाजुला लोकांचा वावर असलेल्या राज्यात लहानाची मोठी झालेली आहे. येथे पशु पक्षांच्या सहवासात माझे मन जास्त दिवस रमायचे नाही. तेव्हा तुम्ही येथे एक सुंदर नगर निर्माण करा.
राजकुमार होकार दर्शवतो.
राजकन्या त्याच्याकडे पाहत आपल्या मैत्रिणीबरोबर आपल्या नगरात निघुन जाते.
    जंगलचा राजा विचार करून चिंतेत पडतो. व कल्पवृक्षाकडे जातो.
    हे कल्पवृक्षा ! आता पुन्हा नगर वसवायचं... ते कसं. आणि पुन्हा हि मानस जंगलाला हानी तर पोहचवणार नाही ना.?
    हे जंगलच्या राजा आपल्या जंगलाच्या कोपऱ्यावर जिथे राजमहाल बांधला आहे तिथे अमाप जागा अजुन शिल्लक आहे. तेथे एक सुंदर नगर निर्माण कर. शेजारच्या नगरात आपल्या वनराई नगरचे जुने नगरवासी आहेत. त्यांना पुन्हा परत येण्यास आव्हान कर. आणि या वनराई नगरचे राज्य घोषित करून तु राजा सम्राट देवराय म्हणुन येथील राज्यकारभार सुरळीत पणे पार पाड. लोकांना बंधने, नियम घालुन दे या जंगलाला कोणतीही हानी पोहोचवायची नाही. येथील जंगलातुन मिळणारी फळे, फुले, औषधी वनस्पती यांचा व्यापार करा. जंगलाशेजारील पडीक जमीन शेती साठी वापरा. पशु पक्षांना त्रास देऊ नका. आणि या नगरवासियामधुन राज्याचे मंत्रिमंडळ, सैनिक,यांची निवड कर.
क्रमश ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...