मंगळवार, ३० जुलै, २०१९

कल्पवृक्ष कथा भाग ४


कल्पवृक्ष भाग चार 



कल्पवृक्षाने सांगितल्याप्रमाणे राजकुमार वनराई नगरवाशीयांना पुन्हा परत येण्याचे आव्हान करतो. व नगरवासी पुन्हा परत येतात. व वनराई नगरला राज्य म्हणुन घोषित करतात. राजकुमारला सम्राट देवराय म्हणुन घोषित करतात. सम्राट देवराय जनतेमधून राज्यकारभार करण्यासाठी योग्य माणसांची निवड करतो. तसेच सैनिक तुकडी हि निर्माण करण्यात येते. सम्राट देवराय आपल्या जनतेला सर्व नियम बंधने घालुन देतो. व एक आदर्श राज्य निर्माण होते. जंगलातील फळे, फुले, औषधी वनस्पती व शेतीमाल यांची बाजारपेठ निर्माण होते. व या बाजारपेठेत शेजारील विजयनगर तसेच इतर राज्यातील व्यापारी हि येथे खरेदी साठी येऊ लागतात. व वनराई नगरची नावलौकिकता आसपासच्या सर्व राज्यामध्ये पोहचते. राजकन्या विजयाच्या कानीही हि बातमी पोहचते.
    राजकन्या विजया भेटीसाठी आतुर होते. आपले वडील विजय सम्राट यांना वनराई नगर राज्यभेटीचा प्रस्ताव मांडते. विजय सम्राट आपल्या मुलीच्या प्रस्तावाला नकार देऊ शकत नाही. तोही तयार होतो.
 आणि वनराई नगरला राज्य भेटीचा खलिता पाठवण्यात येतो. राजा देवरायही होकाराचा खलिता पाठवतो . राजकन्या विजया येणार या आनंदात राजा देवराय वनराई नगर शुशोभित करण्यास सांगतो. वनराई नगरच्या प्रवेशद्वारावर सूर्याच्या प्रतिमेत कल्पवृक्ष असणारा मोठा ध्वज लावण्यात येतो. संपुर्ण नगर विजय सम्राट व राजकन्या विजया यांच्या स्वागतासाठी सज्ज होते.  
 इकडे विजय सम्राट तयारीला लागतो. पाच घोड्यांचा मोठा रथ सजवला जातो रथावर विजयनगरचा मोठा ध्वज लावण्यात येतो. रथामध्ये विजय सम्राट व राजकन्या विजया सोबती सैनिक दास दासी यांचा मोठा समुह घेऊन वनराई नगरकडे प्रस्थान करतो. विजय नगरची सीमा ओलांडताच थंड हवेची झुळूक स्वागत करते. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट वनराई स्वागतास सज्ज. विविध फळाफुलांनी लगडलेली झाडे राजकन्या विजया विजयनगरचा राजा विजय सम्राट सम्राट मन मोहून टाकतात. राजकन्या व राजा प्रवेशद्वाराजवळ येताच विविध पशु पक्षी आपल्या आवाजात त्यांचे स्वागत करतात. वनराई नगरात शिंग, तुताऱ्या, ढोल यांच्या आवाजात राजकन्या आणि राजा यांचे स्वागत होते. खुद्द सम्राट देवराय व प्रजा त्यांचे स्वागत करते. या स्वागताने राजकन्या विजया व राजा विजय सम्राट भारावून जातात. राजा देवरायशी चर्चा करता करता महालात पोहचतात.
राजा देवराय यांच्या राजदरबारी सम्राट विजय व राजकन्या विजया यांचा शाही पाहुणचार होतो. सभागृहात बैठक बसते. सम्राट विजय जेव्हा वनराई नगर मध्ये पोहचला होता तेव्हा पासुन त्याच्या मनात एक विचार घोळत होता. राजकन्या विजया या राज्यांची राणी व्हावी. आणि तो विषय देवराय बोलतात.
सम्राट देवराय ... आमच्या मनी एक मानस आहे तो तुम्ही स्विकारावा.
बोला विजय सम्राट !
आमची कन्या आपण आपली महाराणी म्हणुन स्विकारावी.
हे ऐकून राजकन्या लाजते. आणि देवरायच्या मनात आनंद होतो. परंतु तो चेहऱ्यावर न दाखवता प्रश्न करतात.
पण ?
पण काय ? बोला देवराय ...
आमची एक अट आहे. विजय सम्राट...
कसली अट ?
आम्ही लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात वाढलो. आणि निसर्गाची आवड निर्माण झाली. आज मी तुमच्या कन्येशी विवाह केल्यास आपला जावई होणार. आणि जावई म्हटलं आमची तुमच्या राज्याला भेट नक्की.
हो बरोबर. तुम्हाला यावच लागेल विजय नगरला...
पण आम्ही जिथे निसर्गाची हानी झाली आहे तेथे भेट देत नाही.
मग यावर उपाय सांगावा सम्राट देवराय ! कारण आमची कन्या आम्हाला जिवापेक्षा प्रिय आहे. व या नगरात आल्यापासुन तिच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहिला. असा आनंद यापूर्वी कधीही पाहिला नाही.
तुम्हीही विजयनगर मध्ये जंगलासाठी जागा राखावी व तेथे सुंदर वन उभारावे. व संपूर्ण नगरात झाडे लावण्यात यावी. पशु पक्षांना आसरा दिला जावा.
ठिक आहे. सम्राट देवराय ! आम्ही आताच आमच्या राज्यात गेल्यावर हा उपक्रम हाती घेतो. आणि तुम्हीही त्वरित आपल्या राज्याच्या महाराणी ला न्यायला वरात घेऊन आमच्या नगरात यावे.
विजय सम्राट व राजकन्या विजया आपल्या राज्यात जाण्यासाठी निघतात. तेव्हा विजय सम्राट त्यांच्याबरोबर असंख्य वृक्षांची रोपे व बिया यांचा नजराणा पाठवतो. विजया देवराय कडे आनंदाने पाहत होती. व नजरेने नजरेशी संवाद साधत होती. अशाप्रकारे राजकन्या विजया व विजय सम्राट यांना सम्राट देवराय निरोप देतात. 
क्रमश ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...