मंगळवार, ३० जुलै, २०१९

कल्पवृक्ष कथा भाग २

कल्पवृक्ष भाग दोन 



हे कल्पवृक्षा मी आताच सुरुवात करतो. मुलगा संपूर्ण जंगलभर फिरून फळे गोळा करू लागला त्याने फळे गोळा करता करता संपुर्ण जंगल सिमेचा अभ्यास केला. व काही दिवसात संपुर्ण जंगलातील फळे गोळा करून घेतली व ती फोडुन बियांचा मोठा ढिग लावला. व कल्पवृक्षाकडे जाऊन त्याला विचारू लागला कि फळे गोळा करून फोडुन झाली. आता काय करू?.
    आता हे गोळा केलेले बि संपूर्ण जंगलात पसरून टाक. कारण आता पावसाळा सुरु होईल. व तुझ्या श्रमाची जाण ठेऊन वरुणराजा प्रसन्न होऊन धावत येईल.
    मुलाने संपूर्ण बि जंगलात पसरवले. थोड्याच दिवसात सर्व बिया पसरवण्याचे काम पुर्ण झाले. व पावसाळा सुरु होऊन पाऊस पडु लागला मुलगा खुप आनंदीत झाला व त्या कल्पवृक्षाच्या झाडाला कडकडून मिठी मारली.  “ हे कल्पवृक्षा आज मला वाटते तुझ्या मदतीने मी माझ्या आजीचे वचन सत्यात उतरवत आहे”.
    “हे बघ बाळा तु निस्वार्थी वृत्तीने काम करतो आणि मीही निस्वार्थी वृत्तीने काम करतो दोघांचा हेतु एकच आहे. आणि जो निस्वार्थी वृत्तीने काम करतो तो स्वताच्या मनाचा राजा असतो व तो एक दिवस सर्वांच्या मनात स्थान निर्माण करतो. त्याचप्रमाणे मी आज तुला एक वचन देतो कि, ‘ तुला मी सदैव साथ देईल व तु मला काय मागशील त मिळवण्याचे मार्ग मी तुला स्वतः सांगेल ते तु स्वतः मिळवायचे. कारण ‘स्वतः मिळवण्यात जो आनंद अनुभव असतो तो आयते मिळण्यात नसतो’. पण त्याच बरोबर एक सांगतो कि, तु या जंगलाचा एक दिवस राजा होशील व सर्व प्राणी, पक्षी व झाडे या जंगलात तुझ्या सोबतीला येतील”.
    यावर मुलगा म्हणाला ठिक आहे.
बरेच दिवस निघुन जातात, पावसामागून पाऊस पडून जातात. जंगलामध्ये अनेक ठिकाणी तळी साचतात पाण्याची उपलब्धता भरपुर होते. व पसरलेले बि हळूहळू उगवू लागतात व हे उगवलेले बि पाहुन मुलाच्या मनात आनंद होतो. थोड्याच दिवसात संपुर्ण जंगल हिरवेगार दिसु लागते. झाडे भरभर वाढू लागतात. वाढलेले जंगल पाहुन पक्षी आकर्षित होतात. तसेच हळूहळू छोटे मोठे प्राणी आश्रयाला येतात. सर्व प्राणी पक्षी या जंगलात त्याच्या बरोबर राहु लागतात.
    पण एके दिवशी शेजारच्या राजाची मुलगी आपल्या मैत्रिणीबरोबर फिरत असताना तिची दृष्टी या जंगलावर पडते. व ती दासीबरोबर जंगल पाहायला जंगलात प्रवेश करते. तर हा जंगलचा राजा मुलगा पशु पक्षी यांच्या घोळक्यात जंगलात बसलेला असतो. तेव्हा त्याचे लक्ष त्या राजकन्येवर पडते व मनामध्ये विचार करतो कि, आजपर्यंत या नवीन जंगलात कुणीही माणुस येत नव्हते, पण आज हि मुलगी आपल्या मैत्रिणीबरोबर जंगलात कशी आली. याचा विचार करत तो कल्पवृक्षापाशी जातो. व विचार करतो कि, ती मुलगी कोण ? ती जंगलात कशी आली ?
    यावर कल्पवृक्ष बोलतो कि, तु आजपर्यंत याच जंगलात राहिला व येथीलच विचार केलास पण आता या जंगलाबरोबरच जरा जंगला बाहेरही काही पाहण्यासारखे आहे ते पाहुन घे. कारण ती मुलगी आपल्या शेजारील राज्यातील राजकन्या आहे. ती फिरत असताना तिने हे सुंदर जंगल पाहीले तेव्हा तिला या जंगलाचे आकर्षण निर्माण झाले. तु आता या जंगलाच्या कोपऱ्यावर एक सुंदर राजमहाल तयार कर. कारण तु या जंगलाचा राजा आहे.
    कल्पवृक्षाने सांगितल्याप्रमाणे तो काही दिवसात बाहेरचे जग पाहण्यासाठी जंगलाबाहेर पडला.  तेव्हा त्याला सुंदर घरे, राजमहाल व वेगवेगळी माणसे पाहायला मिळाली . व तो स्वताबद्दल विचार करू लागला, मी या जंगलाचा राजा. जंगलातील पशु पक्षी माझी प्रजा त्यांचे रक्षण मी करणार यासाठी मला बदलायला पाहिजे. कारण मला जंगलाचे, प्राणी, पक्षांचे महत्व समजावून देण्यासाठी त्यांच्यात मिसळले पाहिजे. म्हणुन या जंगलच्या राजाने स्वताच्या अंगावरील रानटी वेश काढून टाकला पाहिजे. व माणसाची कपडे घालुन वावरू लागला. व जंगलाबाहेरील जगाचा अभ्यास करू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले कि, जंगलातील पशु पक्षाच्या बद्दल येथे फार गैरसमज आहेत. त्यांचा अन्नासाठी वापर केला जातो. स्वार्थापोटी शिकार केली जाते. झाडे इंधनासाठी तोडली जातात. यावर तो विचार करू लागला व कल्पवृक्षाने सांगितल्याप्रमाणे जंगलाच्या एका कोपऱ्यावर तो एक सुंदर राजमहाल बांधुन घेतो आणि येथुन जंगलाचे व पशु पक्षांचे रक्षण करण्याचे ठरवतो.
    पुन्हा एके दिवशी ती राजकन्या आपल्या मैत्रिणीबरोबर जंगलाच्या दिशेने निघालेली असते. व जवळ आल्यानंतर तिला हा भव्य राजमहाल नजरेस पडतो. व ती राजकन्या मैत्रिणीबरोबर राजमहालात प्रवेश करते. तेव्हा जंगलचा राजा हाच विचार करत असतो कि या माणसात मिसळायचे कसे ? व त्यांना महत्व पटवून द्यायचे कसे ? तेवढ्यात हि राजकन्या एकदम जंगलच्या राजासमोर येते. तेव्हा राजा हा फक्त त्या राजकन्येकडे पाहत राहतो. व राजकन्याही या जंगलच्या राजाकडे पाहत राहते. दोघांच्याही मनात आकर्षण निर्माण होते. आणि ती राजकन्या लाजुन माघारी निघुन जाते. परंतु राजा हा कर्तव्य विसरलेला नसतो. त्याला माहित असते कि आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा. तो कल्पवृक्षाची भेट घेण्यासाठी जंगलात जातो. व विचारतो.  हे कल्पवृक्षा ! तु मला एका सर्वसामान्य मुलापासून जंगलाचा राजा बनवले त्याचबरोबर जंगलाबाहेरील जगातही वावरायला शिकवले. पण मला आता काळजी वाटते कि, मी या जंगलाचे रक्षण करू शकेल का ?
    हे जंगलच्या राजा तुला मी एक मार्ग सांगतो. कारण मार्ग सांगण्याचे काम माझे आहे. त्यावरून चालायचे तुला आहे. तु त्या राजकन्येला आपली करून घे. पण?
क्रमश ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...