रविवार, १ डिसेंबर, २०१९

नजरा दुषित व्हायला लागल्यात वासनेच्या डोहात बुडायला लागल्यात

नजरा

नजरा दुषित व्हायला लागल्यात
वासनेच्या डोहात बुडायला लागल्यात
तरुण आणि म्हातारा
काय पाहतो पाहणारा
विचित्र सारेच वागायला लागलेत

कधी होते छेडाछेड
कधी होतो बलात्कार
ज्याचं जळतं तेच पळतं
आज सारे मावळे हरवलेत
बाकी सारे फक्त पाहायला लागलेत

चार दिवस सारेच शोक करतात
ज्याला दुःख त्याला जवळ धरतात
शिक्षा होती का नराधमांना
शिक्षेचे प्रश्न प्रश्नच राहिलेत
उलट सरकार त्यांना पोसु लागलेत

कुठं गेली आपली संस्कृती
स्त्री म्हणजे आदिमाया पार्वती
जमाना बदलला पार बदलला
संस्कृती सारे विसरू लागलेत
स्त्रीला मादी म्हणुन पाहु लागलेत

आता डोळ्यांना दिसत नाही
लहान बालिका आणि वयोवृद्ध आजी
या वासनांध नजरेला दिसते फक्त मादी
हि वासनांध जनावरं मोकाट फिरू लागलेत
छेडछाड, बलात्कार आणि अत्याचार करू लागलेत

शिवकाळ आठवा
आठवेल तेव्हाचा न्याय आणि शिक्षा
कसा होता राजांचा मावळा
कशी करीत होता माता भगिनींची सुरक्षा
आता राजांचे विचार विरु लागलेत
आणि मावळे फक्त नावालाच राहिलेत

जेव्हा घडेल असा गुन्हा
भरचौकात ठेचा त्या नराधमांना
सारेजण एक व्हा आणि अशी शिक्षा द्या
करा भरचौकात चौरंग, किंवा फाशीला लटकुया
साऱ्या जगाला कळुदया
पुन्हा आपण सारे शिवकाळ निर्माण करूया

काय घडतंय काय बिघडतय
हे तर समजेना झालंय
घडतात गुन्हे राजरोसपणे
निर्भया, कोपर्डी, हैद्राबाद
कोडीत, दिल्ली आणि गावागावात
घडतात अशी प्रकरणे
एक्कावन्न टक्के दिली आरक्षणे
पण जगात फिरू शकते का महिला सुरक्षित पणे

रोजच्या वर्तमानपत्रात
दरदिवशी बातमीपत्रात
घडतात गुन्हे लाजिरवाणे
विनयभंग, बलात्कार, खून आणि जाळणे
कधी घडतात बाप, भावाचे कृत्य किळसवाणे
आपण मावळे स्वराज्याचे
होऊन एक रोखु अशी प्रकरणे
पुन्हा फिरू शकेल परस्त्री माता बहीण
आपल्या स्वराज्यात सुरक्षितपणे

आठवु छत्रपती शिवरायांचा काळ
एक व्हा मावळयांनो हि तर धोक्याची वेळ
आपल्या विचारातील शत्रुला प्रथम दुर धाडा
वाईट विचारांची प्रवृत्ती दृष्टीस पडता हाणून पाडा
नारीस देऊन सन्मान, बसवा स्त्री संरक्षणाचा मेळ
चला पुन्हा आणूया स्वराज्याची सुंदर नवी सकाळ







फोटो स्त्रोत - इंटरनेट
© राहुल.

      काय घडतय महाराष्ट्रात महाराष्ट्राबरोबरच देशात. रोज एकतरी बातमी बलात्कार, विनयभंग, छेडछाड, आणि मनात वाटत. काय हि वेळ आली आहे. घरी आणि घराच्या बाहेरही स्त्री सुरक्षित नाही. याला कारणीभूत काय? महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार आहेत. मग अशा घटना का घडाव्यात. तर याला कारणीभूत वाटते ती या घडणाऱ्या गुन्ह्यांना मिळणारी शिक्षा. घटना घडते तिचा पंचनामा होतो आरोपीची शोधाशोध आणि शेवटी सिद्धता. हि झाली प्रक्रिया पुढे काय ? ठराविक कालावधीची शिक्षा कारण आपला असा समज आहे कि एकदा शिक्षा मिळाल्यावर तो आरोपी सुधारेल. ज्याला शिक्षा मिळाली तो सुधारेल हो, पण या शिक्षेचे स्वरूप पाहता नवीन निर्माण होतोय त्याचं काय? यासाठी शिक्षेचे स्वरूप गंभीर असावे.
शिवकालीन चौरंग शिक्षा -फोटो स्त्रोत - इंटरनेट 

      जरा आठवा शिवकाळ आणि स्वराज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची शिक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात गुन्हा घडला कि तत्पर आणि कठोर शिक्षा होती. त्यातीलच एक प्रकार चौरंग. हात पाय कलम करून भर चौकात सोडुन देणे जेणे करून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला समजलं पाहिजे याचा गुन्हा काय आणि त्या गुन्ह्यावर शिक्षा काय. म्हणतात ना शिक्षेपुढे भूतही भिते पण त्या शिक्षेचे स्वरूप तसे असले पाहिजे. 
      म्हणुन म्हणतो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील मावळ्यांनो आता तरी सावध व्हा. आपण सारे एक व्हा. मनात शिवविचारांची ज्योत रोज तेवत ठेवा. आणि एक प्रतिज्ञा करा. 
स्वराज्याची प्रतिज्ञा - फोटो स्त्रोत - इंटरनेट 

मी छत्रपती शिवरायांचा मावळा. हे स्वराज्य माझे आहे. या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री मला माते भगिनीसमान आहे. माझ्या स्वराज्यातील आठरापगड जाती धर्मातील बांधव म्हणजे शिवमावळे मला बंधूसमान आहे. त्या सर्वांना एकत्र करून मी पुन्हा शिवविचार जागृत करून या स्वराज्यात घडणारे गुन्हे यावर शिवविचार अस्त्राचा प्रहार करून स्वराज्याचे रक्षण करीन. परस्त्री मातेबहिणी समान हि महाराजांची शिकवण सदैव अंगीकारून महाराजाच्या विचारांशी प्रामाणिकपणे लीन राहील. आणि या स्वराज्याचे रक्षण हेच माझे आद्य कर्तव्य राहील..

महाराज आज स्वराज्य धोक्यात आहे असे वाटते ! मावळ्यांना जागे केले पाहिजे !!


 जय भवानी  जय शिवराय !!!   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...