उघडं बोडकं उजाड रान
डोईवर तापतंय ऊन
वारा सुटेना काही गार
कुठे भेटेना सावलीचा आधार
कसा बदलला हा काळ
एकेकाळी होता सुकाळ
आज पडला का दुष्काळ
माणसाच्या कर्माची ही फळं
बांद बांधुरे राहीले ना नीट
झाड दिसेना दुरवर कुठं
होती झाडे थोडीफार
पण माणुस स्वार्थी फार
चार पैशासाठी तोडली झाडं
ना ठेवली बुंधा ना खोड
आता झाडं लावण्या नाही सवड
पण निसर्गाच्या ताकदीला नाही तोड
नाही पडणार पाऊस इथं
झाडं नसतील जिथं जिथं
पक्षी होतील हद्दपार
किडं खातील शेत शिवार
जातील निघुन मधमाश्या
फळ पिकांची होईल दुर्दशा
नका ठेऊ तुम्ही आशा
विकासाची सोडा आता भाषा
विकास संपेल
निसर्ग कोपेल
मग येतील मरण कळा
संपेन निसर्गाचा जिव्हाळा
म्हणुन सांगतो ऐका
निसर्गाला तुम्हींहो जपा
ताकद मोठी निसर्गाची
परीक्षा नको निसर्गाची
तुम्ही लावा भरपुर झाडं
नाही दिसणार उघडं बोडकं शिवार
धरणी दिसेल हिरवीगार
पक्षी येतील इथेहो फार
नाही कीड पडणार पिकावर
पिके येतील जोमदार
मधमाश्या गोंगावतील
बहरतील फळं नी फुल
हि आहे निसर्गाची कमाल
हे आहे झाडांचे मोल
समजून घ्यावं आता थोडं
प्रत्येकांनी लावावी झाडं
नाही लागणार आता ऊन
हिरवीगार दिसतील रान
गोंगावेल वारा गारगार
नाही लागणार शोधावा सावलीचा आधार
नाही लागणार शोधावा सावलीचा आधार
वृक्षमित्र कवी : राहुल दादा बिचकुले
हरितवारी फाउंडेशन
नाथ देवराई फाउंडेशन माणकोबा वाडा
तसेच सर्व वृक्ष प्रेमींना हि कविता सहृदयी समर्पित ...
झाडे लावा झाडे जगवा, धरणी माईला हिरवा शालू नेसवा....



खूप छान
उत्तर द्याहटवा