बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

माझे आदर्श


लक्ष्य असे असावे मोठे
इतरांना ही हेवा वाटे
जरी असतील वाटेवर काटे
पुढे चालतच रहावे

अनेक भेटतील या वाटेवर
कुणी अडथळा बनेल
कुणी साथ निभावेल
विचार याचा ही करावा
पण मार्ग आपला ना सोडावा

जिवनाची वाटच खडतर
कुठे नसे आधार कुठे असे आधार
आपणच निर्माण करावा आधार
करावा नवा मार्ग साकार
पुन्हा येतील अनेक आपल्याच मार्गावर
पोहचतील तेही यशाच्या शिखरावर

तेव्हा आठवेल त्यांना 
कोण पुढे हा गेला 
ज्याने मार्ग दखविला
असा आहे तो थोर
आदर्श माझ्या समोर

फोटो स्त्रोत - इंटरनेट 

                                                  कवी : राहुल बिचकुले 


गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

प्रेमांकुर २

अपर्णा बोलू लागली - आज मी या निकालात दुसरी आले. परंतु एवढा आनंद झाला आहे की, जो पहिले आले असते तरी झाला नसता ! कारण तुझ्यासारखा स्पर्धक मला मिळाला आणि त्यामुळे मी एवढ्या मार्कने दुसरी आले. मी पहिली आले तेव्हा तू माझा सन्मान केला. आज तू पहिला आला आहेस आज मी तुझा सन्मान केला.  मला अभिमान वाटतो कि तुझ्यासारखा मित्र आयुष्यात प्रत्येक वाटेवर मिळाला पाहिजे.
ती माझ्या डोळ्यात पाहून एकदा गोड हसली आणि स्टेजवरून खाली निघून गेली. मी ही सर्वांचे आभार मानुन स्टेजवरून उतरून खाली आलो.
कार्यक्रम संपला...
सर्वजण घरी निघाले...
मीही निघालो....
तोच अपर्णाने आवाज दिला. रघु !
मी थांबलो. ती जवळ आली आणि बोलु लागली...
रघु सॉरी! वर्षभर मी खुप त्रास दिला तुला... पण तू मात्र माझ्या मनात घर केलंस. एक प्रेमाचा नवा अंकुर निर्माण केलास.
पण ?
पण काय !
मी आता आमच्या गावी पुढे शिकण्यास जात आहे. तुझ्यासारख्या मित्रमैत्रिणींना सोडून जाणं खरंतर जीवावर आलंय पण जावं लागेल. मी नाही विसरणार तुला या शाळेला. प्रत्येक वर्षी आपण एक दिवस नक्की भेटत जाऊ या शाळेत....
मीही मान डोलावून प्रतिउत्तर दिले.
शेवटी ती एवढंच बोलली....
तुझ्याबद्दल खुप आदर वाटतो...
मनात एक प्रेमाअंकुर रुजतो आहे. त्याला जपण्याचा प्रयत्न करीन. नशीब असेल तर भविष्यात पालवी फुटेल...
विसरु नकोस.. !
उज्वल भवितव्यासाठी खुप खुप शुभेच्छा..!!
नाही विसरणार म्हणत तिला शुभेच्छा देऊन मी आणि ती दुःखी मनाने आपापल्या रस्त्याने चालु लागलो....

आज आता वर्ष होत आलं आहे मी माझे ध्येय ठरवून वाटचाल करीत आहे. तिने दिलेला पेन आजही खिशाला दिमाखात लावुन 
 प्रेमाअंकुर जपण्याचा प्रयत्न करीत आहे.

ती सध्या काय करीत आहे ?



लेखक : राहुल दादा बिचकुले 


फोटो स्त्रोत - इंटरनेट 



प्रेमांकुर १

      आयुष्याच्या कॅलेंडर मध्ये रोजच्या जगण्याच्या तारखा पुढे सरकत होत्या त्याबरोबर माझे प्राथमिक - माध्यमिक शिक्षण ही सरून गेलं आणि जिवनात एकटं पडल्यासारखे वाटु लागले. जिंदगी बोअर वाटु लागली. ना मित्र ना मैत्रिणी कुठं जायचं कुठं यायचं मैदानी फिरायचं तेबी एकट्यानं....
दहावी सरून गेली होती आणि निकाल बी लागला होता. नाही म्हटलं तरी ६५℅ मार्क मिळाल्यामुळे घरचेबी खुश होते... माझ्या परस्पर त्यांनी पोरगं हुशार आहे म्हणत हॉस्टेलला ठेऊन मला शिकवायचं ठरवलं..
       होस्टेल म्हणताच मनात धस्स झालं कारण माझं आणि मित्राचं विचार कधीच जुळत नव्हते. मग आता जुळेल ते कशावरून म्हणून मी होस्टेलवर राहण्यास नकार दिला. आणि जवळच तालुक्याच्या मध्यवर्ती गावात घरापासून १०-१५ किलोमीटर अंतरावर अकरावीला ऍडमिशन घेतलं आणि रोज जाऊ लागलो . कॉलेजमध्ये गेलो पण या गावठी पोराबरोबर मैत्री कोणी करिना असे करत सहा महिने गेले. मीही दिवसेंदिवस खचतच चाललो होतो. सहामाही परीक्षा झाली निकाल लागला. कॉलेजमध्ये वर्गात अर्पणा नावाची मुलगी पहिली आली दुसरीही मुलगीच आली आणि तिसरा मुलगा आला. माझा निकाल मी पाहिला तर दोन विषयात अक्षरशः नापास झालो होतो. म्हणजे परिस्थिती आणखीच बदलली होती. दहावीचा निकाल पाहुन मिळालेले दोस्तही दूर झाले व थोडेफार उनाडक्या करणारे दोस्तही जवळ घेत नव्हते कारण मला उनाडक्या जमत नव्हत्या....
         शेवटी या खंगलेल्या मनानी एक निश्चय केला काही झालं तरी वर्षाच्या शेवटी आपण पहिलं यायचं आणि सगळ्यांना दाखवून द्यायचं की, " हम भी किसींसे कम नही." आणि सुरुवात केली त्यापद्धतीने अभ्यास नियोजन करून मी वर्षाच्या शेवटी पहिला आलो...
    आणि बऱ्याच जणांचा मित्र झालो पण अपर्णाचा स्पर्धक झालो कारण तिला माझ्यामुळे दुसरं यावं लागलं.
     सुट्टी सरून गेली आणि बारावीचं वर्ष उजाडलं....

    आता जिंदगीत कुठेतरी इंटरेस्ट यायला सुरुवात झाली होती. सगळ्यांचा रघुनाथ आता रघु झाला होता. मित्र मला आताही मिळाले नसते पण आता मैत्रिणी माझ्याबरोबर बऱ्याच होत्या. सुकन्या आणि गीता या उनाड मुली अभ्यासाचा पुजारी मानायला लागल्या होत्या. दिसायलाही त्या टॉप होत्या आणि डॅशिंग ही होत्या. पण मन तर अपर्णावर भाळलं होतं दिसायला साधी सोजवळ, थोडीसी हट्टी आणि गोरीगोमटी त्यातच आपण आता तिचा विरोधक होतो.  पण मनात कुठेतरी वाटत होतं की, आजवर आपण खुप एकाकी जीवन जगत आलो पण आता आपण आपलं ध्येय ठेऊन जगायचं. आणि याही वर्षी पहिलं यायचं !
   सुरुवात तर जोरदार केली. एका वर्गात दोन गट झाले एक माझा तर एक अपर्णाचा तिच्या बाजुने मुलांची संख्या जास्त तर माझ्या बाजुने मुलींची संख्या जास्त होती ते प्लॅन करून एकत्रितपणे अभ्यास करू लागले आणि आम्ही एकत्रितपणे अभ्यास करण्याचा प्लॅन केला. यामध्ये अभ्यासही जोरदार पद्धतीने होऊ लागला पण या स्पर्धेत माझी आणि अपर्णाची एक खुन्नस निर्माण झाली ती वर्गात आल्यावर माझ्याकडे किंवा मी वर्गात आल्यावर तिच्याकडे न पाहिलेला एकही दिवस उजडेनासा झाला. त्यामुळे दोघांच्याही मनात एकमेकांविरोधात खुन्नस निर्माण झाली पण माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम भावना जागी होत असे पण ध्येय होते पुढे जायचं त्यामुळे प्रेमाला ताडून पुढे जाण्याचा मी प्रयत्न करीत होतो. असे करीत सहामाही संपून सहामाहीचा निकाल १००℅  लागला दोन्ही गट पास झाले आणि अपर्णा माझ्यापुढे ५% ने गेली. त्यामुळे चेहऱ्यावर तिच्या हसु आलं. मला अभिमान वाटला कारण तिच्यामुळे आज मला एक स्पर्धक मिळाला होता आणि त्यामुळेच मला मित्र मैत्रिणी मिळाल्या होत्या.
     निकाल जाहीर झाल्यानंतर मी अपर्णाच अभिनंदन करायचं ठरवलं  म्हणुन मस्त डायमंड चे खडे असलेला पेन गिफ्ट म्हणुन घेतला व दुसऱ्या दिवशी आमच्या गटाच्या वतीने म्हणुन मी तिला हे गिफ्ट वर्गात सर्वांसमोर दिले व तिचे अभिनंदन केले. तेव्हा तिच्या डोळ्यातील चमक मला आणखीच भुलवून गेली आणि मनात प्रेमाचा नवा अंकुर उगवु लागला.
तिच्याही मनात माझ्याविषयी प्रेमभावना असतील असं मन मला सतत सांगत होते.
तिच्यावरील प्रेमभावना कोमेजून न देता मी अभ्यासाची तयारी भरपूर केली आणि वर्षाशेवटी बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलो. आणि अपर्णा दुसरी आली. मन खुप आनंदुन गेलं. पण मनात एक सल निर्माण झाली. अपर्णा दुसरी आली म्हणून नाराज झाली असेल.
     कॉलेजमध्ये निकाल वाटपाचा दिवस उजाडला सर्वजण आनंदात उपस्थित होते. पण मी पहिला येऊनही आज नाराज होतो आणि सर्वांमध्ये फक्त एकच चेहरा शोधत होतो. अपर्णा कुठे दिसतेय. पण अपर्णा कुठेच दिसत नव्हती. सन्मानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि मला स्टेजवर बोलावले गेले. मीही इकडे तिकडे पाहत स्टेजकडे जाऊ लागलो. तोच दुसऱ्या बाजुने अपर्णा एक पुष्पगुच्छ घेऊन स्टेजकडे येत होती. चेहऱ्यावर खुप आनंदही दिसत होता. दोघेही स्टेजवर आलो. शिक्षकांनी दोघांचेही अभिनंदन केले. आणि अपर्णाने पुष्पगुच्छ व सोबत एक सुंदर सजावट असलेला पेन मला गिफ्ट दिला.



फोटो स्त्रोत - इंटरनेट 


पुढील भाग प्रेमांकुर २ ....

रविवार, १ डिसेंबर, २०१९

नजरा दुषित व्हायला लागल्यात वासनेच्या डोहात बुडायला लागल्यात

नजरा

नजरा दुषित व्हायला लागल्यात
वासनेच्या डोहात बुडायला लागल्यात
तरुण आणि म्हातारा
काय पाहतो पाहणारा
विचित्र सारेच वागायला लागलेत

कधी होते छेडाछेड
कधी होतो बलात्कार
ज्याचं जळतं तेच पळतं
आज सारे मावळे हरवलेत
बाकी सारे फक्त पाहायला लागलेत

चार दिवस सारेच शोक करतात
ज्याला दुःख त्याला जवळ धरतात
शिक्षा होती का नराधमांना
शिक्षेचे प्रश्न प्रश्नच राहिलेत
उलट सरकार त्यांना पोसु लागलेत

कुठं गेली आपली संस्कृती
स्त्री म्हणजे आदिमाया पार्वती
जमाना बदलला पार बदलला
संस्कृती सारे विसरू लागलेत
स्त्रीला मादी म्हणुन पाहु लागलेत

आता डोळ्यांना दिसत नाही
लहान बालिका आणि वयोवृद्ध आजी
या वासनांध नजरेला दिसते फक्त मादी
हि वासनांध जनावरं मोकाट फिरू लागलेत
छेडछाड, बलात्कार आणि अत्याचार करू लागलेत

शिवकाळ आठवा
आठवेल तेव्हाचा न्याय आणि शिक्षा
कसा होता राजांचा मावळा
कशी करीत होता माता भगिनींची सुरक्षा
आता राजांचे विचार विरु लागलेत
आणि मावळे फक्त नावालाच राहिलेत

जेव्हा घडेल असा गुन्हा
भरचौकात ठेचा त्या नराधमांना
सारेजण एक व्हा आणि अशी शिक्षा द्या
करा भरचौकात चौरंग, किंवा फाशीला लटकुया
साऱ्या जगाला कळुदया
पुन्हा आपण सारे शिवकाळ निर्माण करूया

काय घडतंय काय बिघडतय
हे तर समजेना झालंय
घडतात गुन्हे राजरोसपणे
निर्भया, कोपर्डी, हैद्राबाद
कोडीत, दिल्ली आणि गावागावात
घडतात अशी प्रकरणे
एक्कावन्न टक्के दिली आरक्षणे
पण जगात फिरू शकते का महिला सुरक्षित पणे

रोजच्या वर्तमानपत्रात
दरदिवशी बातमीपत्रात
घडतात गुन्हे लाजिरवाणे
विनयभंग, बलात्कार, खून आणि जाळणे
कधी घडतात बाप, भावाचे कृत्य किळसवाणे
आपण मावळे स्वराज्याचे
होऊन एक रोखु अशी प्रकरणे
पुन्हा फिरू शकेल परस्त्री माता बहीण
आपल्या स्वराज्यात सुरक्षितपणे

आठवु छत्रपती शिवरायांचा काळ
एक व्हा मावळयांनो हि तर धोक्याची वेळ
आपल्या विचारातील शत्रुला प्रथम दुर धाडा
वाईट विचारांची प्रवृत्ती दृष्टीस पडता हाणून पाडा
नारीस देऊन सन्मान, बसवा स्त्री संरक्षणाचा मेळ
चला पुन्हा आणूया स्वराज्याची सुंदर नवी सकाळ







फोटो स्त्रोत - इंटरनेट
© राहुल.

      काय घडतय महाराष्ट्रात महाराष्ट्राबरोबरच देशात. रोज एकतरी बातमी बलात्कार, विनयभंग, छेडछाड, आणि मनात वाटत. काय हि वेळ आली आहे. घरी आणि घराच्या बाहेरही स्त्री सुरक्षित नाही. याला कारणीभूत काय? महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार आहेत. मग अशा घटना का घडाव्यात. तर याला कारणीभूत वाटते ती या घडणाऱ्या गुन्ह्यांना मिळणारी शिक्षा. घटना घडते तिचा पंचनामा होतो आरोपीची शोधाशोध आणि शेवटी सिद्धता. हि झाली प्रक्रिया पुढे काय ? ठराविक कालावधीची शिक्षा कारण आपला असा समज आहे कि एकदा शिक्षा मिळाल्यावर तो आरोपी सुधारेल. ज्याला शिक्षा मिळाली तो सुधारेल हो, पण या शिक्षेचे स्वरूप पाहता नवीन निर्माण होतोय त्याचं काय? यासाठी शिक्षेचे स्वरूप गंभीर असावे.
शिवकालीन चौरंग शिक्षा -फोटो स्त्रोत - इंटरनेट 

      जरा आठवा शिवकाळ आणि स्वराज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची शिक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात गुन्हा घडला कि तत्पर आणि कठोर शिक्षा होती. त्यातीलच एक प्रकार चौरंग. हात पाय कलम करून भर चौकात सोडुन देणे जेणे करून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला समजलं पाहिजे याचा गुन्हा काय आणि त्या गुन्ह्यावर शिक्षा काय. म्हणतात ना शिक्षेपुढे भूतही भिते पण त्या शिक्षेचे स्वरूप तसे असले पाहिजे. 
      म्हणुन म्हणतो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील मावळ्यांनो आता तरी सावध व्हा. आपण सारे एक व्हा. मनात शिवविचारांची ज्योत रोज तेवत ठेवा. आणि एक प्रतिज्ञा करा. 
स्वराज्याची प्रतिज्ञा - फोटो स्त्रोत - इंटरनेट 

मी छत्रपती शिवरायांचा मावळा. हे स्वराज्य माझे आहे. या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री मला माते भगिनीसमान आहे. माझ्या स्वराज्यातील आठरापगड जाती धर्मातील बांधव म्हणजे शिवमावळे मला बंधूसमान आहे. त्या सर्वांना एकत्र करून मी पुन्हा शिवविचार जागृत करून या स्वराज्यात घडणारे गुन्हे यावर शिवविचार अस्त्राचा प्रहार करून स्वराज्याचे रक्षण करीन. परस्त्री मातेबहिणी समान हि महाराजांची शिकवण सदैव अंगीकारून महाराजाच्या विचारांशी प्रामाणिकपणे लीन राहील. आणि या स्वराज्याचे रक्षण हेच माझे आद्य कर्तव्य राहील..

महाराज आज स्वराज्य धोक्यात आहे असे वाटते ! मावळ्यांना जागे केले पाहिजे !!


 जय भवानी  जय शिवराय !!!   

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

सोबतुया सुंदर जातिवंत धनगर

पारंपरिक वेषभूषा - श्रीकांत हंडाळ केडगाव ( दिवाळी 2019 )




सोबतुया सुंदर
जातिवंत धनगर
पटका डोईवर 
घोंगडी खांद्यावर


हाती घेऊन कुऱ्हाड 
राखीतो मेंढरं
बिरोबा अवतरला 
धनगर वाड्यावर


आवड छंदातून
संस्कृती दर्शन
जगाला दाखविता
धनगरी जीवन


प्रत्येकाने असेच वागावे
मनमोकळे जगावे
महान आपुली संस्कृती
अभिमानाने सांगावे

लेखांकन : राहुल दादा बिचकुले


सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर स्मृतिदिन




असा एक तो वीर

आद्य स्वातंत्र्य वीर

अजिंक्य महायोद्धा
चक्रवर्ती महाराजाधिराज
रणझुंजार कार्यधुरंधर
चक्रवर्ती सम्राट महाराजा
श्रीमंत यशवंतराव होळकर



काय वर्णावी तयाची महती

जगामध्ये अजरामर किर्ती
शत्रु मनी भरली भीती
इतिहासाची पाने साक्ष देती



मराठी अस्मितेचा हुंकार

भगवे निशाण फडकाविले
दिल्ली तख्तावर
तेजोमय उत्तर हिंदुस्थानी
केला कारभार
राज्य गाजविले सर्वांच्या मनावर



लढा स्वातंत्र्यासाठी उभारला

जनसामान्य मावळा एक केला
कधी कुणापुढे ना झुकला
सलाम  या अजिंक्य महायोध्याला



तुम्हीच प्रेरणा

तुम्हीच ताकद आमुची
तुम्हीच अभिमान
तुम्हीच शान आमुची



करितो वंदन

आज स्मृतीदिनी
अखंड स्मृतीदीप
तेवत राहील मनी
कोणापुढे झुकणार ना कधी
रुजवील तुमचे विचार मी मनामधी



वंदन माझे महाराष्ट्राच्या राजाला

छत्रपती शिवाजी राजाला
वंदन माझे बा मल्हारबाला
त्यांच्या थोर कर्तुत्वाला
वंदन माझे पुण्यश्लोक राजमातेला
श्रद्धास्थान राजमाता अहिल्यादेवींना
करितो नमन थोर संत महापुरुषांना
त्यांच्या थोर विचारांना
स्मृतीदिनी वाहतो शब्द पुष्पांजली
प्रेरणास्थान महानायकाला
थोर श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर
यांच्या पुण्य स्मृतीला





आद्य स्वातंत्र्यवीर अजिंक्य महायोद्धा महाराजाधिराज श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर स्मृतिदिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.....





आद्य स्वातंत्र्यवीर अजिंक्य महायोद्धा महाराजाधिराज श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर जयंतीनिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा.....

    शुभेच्छूक : कवी राहुल दादा बिचकुले

माणकोबावाडा यवत - ८८८८८९७५३३
bichkulerahul3@gmail.com

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

नेता जोमात कार्यकर्ता कोमात

राजकीय वाद photo source - internet


जो राजा तोच आदेश करी

ज्याच्याकडे सत्ता तो राज करी

राजा राजाचं युध्द
युद्ध संपता होती एक
प्रजेचं लागलं भांडण
वैर पेरती जन्माचं

कुणी लावतात घोडं
कुणी पाठवी स्मशानात
विरोधकांच्या काय नशिबात
दिवस काढावे लागतात सुतकात

आरं कसलं हे राजकारण
हार जितीचा हा खेळ
युध्द लढणारे दोन वीर
बसवितात पुन्हा मेळ

हे कधी कळेल प्रजेला
झालं तिथं सोडुन देणं
भाऊबंदकी शेजारी पाजारी
पुन्हा गुण्यागोविंदाने एक येणं

नाही समजणार यांना कधी
पार बुडाले राजकारणामधी
नाती गोती शेजारी पाजारी
विरोधक झाले सारे बांधकरी

कशाला हवं हे राजकारण
नेते राहतील सुखात
कार्यकर्ते करून भांडण
घरं बुडवतील दुःखात

आता तरी सावध व्हा
राजकारणाकडे राजकारण म्हणुन पहा
आपला नेता म्हणुन थोडं वेगळं रहा
होता निवडणूक पुन्हा प्रेमानं एकत्र या
होता निवडणूक पुन्हा प्रेमानं एकत्र या

एक सामाजिक कार्यकर्ता : कवी : राहुल दादा बिचकुले

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

हक्क मतदानाचा

बोटावर लावुन शाई

घडवु आदर्श लोकशाही
करू नका तुम्ही घाई

भुलू नका पैश्यापाई

आपला हक्क दाखवून द्या

मनातील लोकनेता निवडून द्या

चला आपण मतदान करूया

महाराष्ट्र विकासाला साथ देऊया

👆👆👆👆👆👆


सर्व मतदारांना आपल्या हक्काच्या दिवसासाठी खुप खुप शुभेच्छा

                                 शुभेच्छूक : राहुल दादा बिचकुले

2019 विधान सभा निवडणुक 

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

मैत्रीतील गोडवा


मैत्रीतील गोडवा 


मैत्रीचं बंधन
त्याला आपुलकी चं कोंदण
हे नातं वेगळंच असतं
एकमेकांशिवाय अधुरं
जशी पावाशिवाय मिसळला चव नाही...
गुळ साखरे शिवाय चहाला
तसंच मित्रांशिवाय मैत्रीला मजा नाही....
गुळ आणि साखर दोन्हीपासुन चहा बनवता येतो.
पण चव वेगवेगळी....
साखरेचा चहा तर रोजच पितो
पण गुळाचा आपुलकीने .....
मित्र असंख्य आहेत पण तुम्ही मात्र गुळासारखे....
आपुलकी, प्रेम, याने पुरेपुर भरलेले
अशा माझ्या गुळासारख्या गॉड मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


आपला मित्र..... 

मैत्री बंधन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री बंधन दिवस



खेळाच्या मैदानावर
आठवण ज्याची येते
शाळेच्या गेटवर
वाट ज्याची पहाते
असे हे जगावेगळे
मैत्रीचे हे नाते

कधी रुसायचं
कधी फुगायचं
कधी हसायचं
कधी बसायचं
नाश्त्याच्या कट्ट्यावर
एकत्र बसुन जेवायचं

वस्तूची देवाण घेवाण
एकमेकांना घ्यायचं समजुन
अडीनडीला पैश्याचही दान
जिथं नाही हिशोबाला स्थान
असा आहे दोस्तीचा बहुमान
हिच दोस्ती हिच मैत्री
हेच तर मैत्रीचे हे नाते
जे मित्र मैत्रिणींविना रिते.....

    आज मैत्रीबंधन दिवस माझ्या सर्व मित्र मैत्रिणींची खुप आठवण येते. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या तरी गोष्टीतुन मित्र असतो. मित्र म्हणजे कोण आपल्या मनातील ओझं ज्याच्यापाशी हलकं करता येईल अशी व्यक्ती. 

   आजवर मला असंख्य मित्र मिळाले. त्यात विशेष तुम्ही आहात. तुमचे स्थान मित्र म्हणुन अढळ आहे. कारण जीवन जगत असताना कळत नकळत तुम्ही मला जीवनाच्या प्रत्येक वळणावर साथ दिली आहे. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐



माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मैत्रीबंधन दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐💐
आपलाच मित्र......!!! 

मंगळवार, ३० जुलै, २०१९

कल्पवृक्ष कथा भाग ५


कल्पवृक्ष भाग पाच 




विजय सम्राट विजय नगरात पोहचताच नगरात दवंडी पिटतो. व सर्वत्र वृक्षलागवड करण्यात यावी. पशु पक्षांना आसरा देण्यात यावा. व आपल्या विजय नगरात एक जंगल तयार करण्यात यावे असे फर्मान काढतो. सर्व प्रजा, मंत्रीमंडळ, खुद्द राजा व राजकन्या या वृक्षलागवड चळवळीत सहभागी होतात. जंगलाची जागा राखली जाते. तेथे एक मंदिर उभारून ते वन देवाच्या नावाने देवराई म्हणुन राखले जाते. या वनाला कुणीही हानी पोहचवायची नाही. याचे संगोपन करायचे व यातुन मिळणारी वनसंपती फळे, फुले, औषधी वनस्पती यांचा व्यापार करायचा असा नियम केला जातो.
विजयनगरला एक खलिता येतो....
मी वनराई नगरचा राजा सम्राट देवराय आपल्या वन निर्मितीच्या कार्याने खुश आहे. व माझ्या राज्याची महाराणी म्हणुन मी आपल्या कन्येचा स्वीकार करण्यासाठी येत आहे.
    संपूर्ण विजय नगरमध्ये आनंदाचे वातावरण होते. सम्राट देवराय च्या स्वागताची तयारी करण्यात येते. विजय नगरच्या प्रवेशद्वारापाशी सम्राट विजय राजकन्या विजया आणि मंत्रिमंडळ व सर्व प्रजा वाट पाहत असतात. दुरूनच वनराई नगरचा ध्वज दिसु लागतो. सगळीकडे वाद्यांचा आवाज घुमू लागतो. मोठ्या उत्साहात सम्राट देवरायचे स्वागत होते. सम्राट देवराय व राजकन्या विजया यांच्या लग्नाची तयारी होते. मोठ्या उत्साहात त्यांचा विवाह लावुन दिला जातो. व हुंडा म्हणुन सोने नाणे दिले जाते.
     तेव्हा देवराय विजय सम्राटशी बोलतो. माझ्या राज्यात माझी देवराई, वृक्ष, वेली, पशु, पक्षी हेच माझं सोन आहे त्यामुळे द्यायचे असेल तर भेट म्हणुन वृक्ष वेली द्या.
    तेव्हा विजय सम्राट आपल्या राज्यातील रोपवाटिकेतुन अनेक वृक्ष भेट म्हणुन देतात. व आनंदाने पाठवणी करतात.
    राजकन्या विजया आनंदाने सम्राट देवराय सोबत जाण्यास निघते.
वनराई नगरच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होताच. विविध वाद्य वाजू लागतात. नव्या महाराणीचे व सम्राट देवरायांचे स्वागत होते. संपुर्ण नगरात पाठवणी सोबत आलेली रोपे वाटली जातात. आणि रथ राजमहालाची वाट चुकवत जंगलाच्या दिशेने घेण्यास सम्राट देवराय सांगतात. सोबत मंत्रीमंडळ व प्रजा ही असते. रथ जंगलातुन तळ्याकाठी येऊन थांबतो. सम्राट देवराय त्या कल्पवृक्षाच्या झाडाला कडकडून मिठी मारतो. डोळ्यातुन अश्रू धारा येतात.
तेव्हा विजया प्रश्न विचारते.
तुम्ही या झाडाला मिठी का मारली ?
तेव्हा देवराय विजया बरोबर सर्व प्रजेला सांगतो.
    हि ती देवता आहे. जिने हे जंगल घडवले, एका आजीचे वचन पुर्ण केले, एका सामान्य मुलाला राजा केले, आणि विस्थापित झालेल्या नगरवाशीयांना पुन्हा आपल्या राज्यात आणले. व एक नवे राज्य निर्माण केले. हाच तो कल्पवृक्ष ज्याने आजवर मला माझ्या कार्यात मदत केली. माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. आता तुम्हीही या वृक्षाची पूजा करा व वन रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या.
    सम्राट देवराय व राणी विजया कल्पवृक्षाची पुजा करतात. व वृक्षातून आवाज सम्राट देवराय तुझे कार्य महान आहे. आणि पुढेही असेच चालु ठेव. जर निसर्ग जपला तर तोही तुम्हाला जपेल. आणि निसर्गाला हानी पोहचवाल तर तोही तुमच्यावर कोपेल. आता माझे कार्य संपले. आता तुम्हीच अंतर्मनातील शुद्ध विचाराची ज्योत पेटवा व  कार्य करा. तुमच्या मनाला जे चांगले वाटेल ते करा. निसर्ग संवर्धन करा. पशु पक्षांना आसरा द्या. तुम्ही सर्व सुखी होताल. आणि आवाज बंद होतो.
    सम्राट देवरायाच्या डोळ्यात पाणी येते. आणि एक घोषणा करतो. या कल्पवृक्षाच्या शेजारी एक वनदेवीचे मंदिर बांधण्याची.
    मंदिराचे काम पुर्ण होते. राजा - प्रजा सर्व वनदेवीची पूजा करतात. उत्सव म्हणुन आपल्या राज्याबरोबर शेजारील राज्यातही वृक्ष लागवडीची चळवळ उभी करतात. आणि सम्राट देवराय राणी विजया आणि वनराई नगरची प्रजा या वनराई नगरात सुखाने राहतात. आणि उगवत्या सूर्याच्या प्रतिमेच्या मध्ये कल्पवृक्ष हा ध्वज “निसर्ग संवर्धन करा ती काळाची गरज आहे” हा संदेश देत अखंड वनराई नगरच्या राजमहालावर व वनदेवीच्या मंदिरावर व या वनराई नगरात फिरायला जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात फडकत आहे.

तात्पर्य :- मन हेच कल्पवृक्ष आहे. शुद्ध मनाने घेतलेले निर्णय आमलात आणा तेव्हा काहीतरी चांगले घडेल. निसर्ग संवर्धन करा ती बदलत्या काळाची गरज आहे.   

    लेखक : राहुल दादा बिचकुले
मो. ८८८८८९७५३३        .

कथा आवडल्यास आवर्जुन प्रतिसाद द्या......

धन्यवाद !!!

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...