झेंड्याचे राजकारण
भाऊ वातावरणात लई बिघाड झाला बग !
आता पाऊस टाइमाव पडत नाय की पिक मोसमात येत नाय...
निसर्गाचं चाळींदर बिगडल पार... लई आवघाड होऊन बसलंय बग.
याला कारण काय र दादा ?
माणुस अन दुसरं काय ?
कसं?
आरं पुर्वी माणसं कशी होती... विरोधक होती पण स्वतःच्या स्वराज्याबद्दल अभिमान होता.
आपलं ह्रदय छत्रपती शिवाजी राजं यांचं काम आणि त्यांचं इचार बग.
झेंडा एकच भगवा.... हिंदुत्वाच प्रतिक पण त्याच्या सावलीत अठरापगड जातीच मावळ जीवाला जीव लावून लढत होतं.... या भूमीचं आणि स्वराज्याच रक्षण करत होतं. सगळी कशी गुण्यागोविंदाने राहत होती. तव्हा काळ आणि निसर्ग ही त्यांच्या या एकीकडे पाहुन आनंदानी बिलगायला यायचा....
पण आज ? आज फार येगळ चाललंय प्रत्येकांनी आपापला झेंडा शोधलाय.... आणि आपल्यातच वैर पेरून बसलाय....
प्रत्येकाच्या धर्माचा झेंडा येगळा....
प्रत्येकाच्या जातीचा झेंडा येगळा....
आन प्रत्येकाच्या पक्षाचा झेंडा येगळा....
यात पार इसरून गेली त्या दोन झेंड्याला एक आपल्या भारताचा तिरंगा आन दुसरा आपल्या राजाच्या स्वराज्याचा भगवा ....
माणुस फार स्वार्थी झाला......
देशावर कोणतंही संकट येऊद्या तरी त्या काळात हे जातीपातीचे, धर्माधर्मांचे झेंडे मोठ्या दिमाखात फडकवीत असतात हि माणसं.... फक्त माणुस म्हणता येणार नाही तर विशिष्ट गटांची माणसं म्हणावी लागेल.....
आज जाती पातीच सोडा घराघरात दोन तीन झेंडे घुसायला लागलेत.... पोरगा एका पक्षात, बाप दुसऱ्या पक्षात तर आजा तिसऱ्याच पक्षात...
कसा माणुस एक व्हायचा.......
जोवर हे झेंड्याचे राजकारण माणुस नावाच्या प्राण्याच्या डोक्यातुन जाणार नाहील
तवर ना गावाचा... ना राज्याचा.... ना देशाचा कुणाचाच ईकास होणार नाही.
जोवर माणुस मनातील हे झेंड्याचे राजकारण मनातुन काढून या देशासाठी आपल्या माय भूमीसाठी एकत्र येणार नाही तोवर....
आपल्याला आस्मानी सुलतानी संकट त्याचबरोबर आपल्यातील वैराला तोंड द्यावेच लागेल. मग शेवटी ठरलंच आहे..
काय ?
आपुनच आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं आन दुसरं काय....
म्हणुन एक व्हा आणि एका झेंड्याखाली एकत्र या हे शिवतंत्र अवलंबाल तर कोणत्याही संकटात तराल.....
लेखक : राहुल दादा बिचकुले
भाऊ वातावरणात लई बिघाड झाला बग !
आता पाऊस टाइमाव पडत नाय की पिक मोसमात येत नाय...
निसर्गाचं चाळींदर बिगडल पार... लई आवघाड होऊन बसलंय बग.
याला कारण काय र दादा ?
माणुस अन दुसरं काय ?
कसं?
आरं पुर्वी माणसं कशी होती... विरोधक होती पण स्वतःच्या स्वराज्याबद्दल अभिमान होता.
आपलं ह्रदय छत्रपती शिवाजी राजं यांचं काम आणि त्यांचं इचार बग.
झेंडा एकच भगवा.... हिंदुत्वाच प्रतिक पण त्याच्या सावलीत अठरापगड जातीच मावळ जीवाला जीव लावून लढत होतं.... या भूमीचं आणि स्वराज्याच रक्षण करत होतं. सगळी कशी गुण्यागोविंदाने राहत होती. तव्हा काळ आणि निसर्ग ही त्यांच्या या एकीकडे पाहुन आनंदानी बिलगायला यायचा....
पण आज ? आज फार येगळ चाललंय प्रत्येकांनी आपापला झेंडा शोधलाय.... आणि आपल्यातच वैर पेरून बसलाय....
प्रत्येकाच्या धर्माचा झेंडा येगळा....
प्रत्येकाच्या जातीचा झेंडा येगळा....
आन प्रत्येकाच्या पक्षाचा झेंडा येगळा....
यात पार इसरून गेली त्या दोन झेंड्याला एक आपल्या भारताचा तिरंगा आन दुसरा आपल्या राजाच्या स्वराज्याचा भगवा ....
माणुस फार स्वार्थी झाला......
देशावर कोणतंही संकट येऊद्या तरी त्या काळात हे जातीपातीचे, धर्माधर्मांचे झेंडे मोठ्या दिमाखात फडकवीत असतात हि माणसं.... फक्त माणुस म्हणता येणार नाही तर विशिष्ट गटांची माणसं म्हणावी लागेल.....
आज जाती पातीच सोडा घराघरात दोन तीन झेंडे घुसायला लागलेत.... पोरगा एका पक्षात, बाप दुसऱ्या पक्षात तर आजा तिसऱ्याच पक्षात...
कसा माणुस एक व्हायचा.......
जोवर हे झेंड्याचे राजकारण माणुस नावाच्या प्राण्याच्या डोक्यातुन जाणार नाहील
तवर ना गावाचा... ना राज्याचा.... ना देशाचा कुणाचाच ईकास होणार नाही.
जोवर माणुस मनातील हे झेंड्याचे राजकारण मनातुन काढून या देशासाठी आपल्या माय भूमीसाठी एकत्र येणार नाही तोवर....
आपल्याला आस्मानी सुलतानी संकट त्याचबरोबर आपल्यातील वैराला तोंड द्यावेच लागेल. मग शेवटी ठरलंच आहे..
काय ?
आपुनच आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं आन दुसरं काय....
म्हणुन एक व्हा आणि एका झेंड्याखाली एकत्र या हे शिवतंत्र अवलंबाल तर कोणत्याही संकटात तराल.....
लेखक : राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी