रविवार, २४ एप्रिल, २०२२

कवी लेखकांच्या लेखणीचा आपण करावा सन्मान

मजजवळी नाही काही
आहे शब्दांचेच धन
कोणती मोठी कला नाही
जमते शब्दांची गुंफण

बळ देते लेखणीला
कौतुकाचे शब्द दोन
जरी असली फाटकी झोळी
मज वाटे मी मोठा धनवान

नको नको मज काही 
तरी मागतो एक मागणं
कवी लेखकांच्या लेखणीचा
आपण करावा सन्मान

कवी लेखकांच्या ठायी
शब्द रत्न अलंकारासमान
जोडुनी शब्दांशी शब्द
मिळवितो मोठा बहुमान

कवी : राहुल दादा बिचकुले
माणकोबावाडी यवत, ता. दौंड, जि. पुणे

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

कवीचा विचार

नको मांडु शब्द
गुंफूनी एकमेकात
दुःख असे मांडतो
जणु आहेस सुखात

कल्पना कल्पना असते
त्याला भावनेचा आधार
सर्वकाही सत्यच मांडतो
पण हा कवीचा विचार

शब्द विश्वात रमतो
सदा आनंदी दिसतो
हळवं हे मन 
दुःखी चेहराही वाचतो

ओठावर दिसतं समाधान
डोळं वेगळंच सांगतं
दुःखी असतं हे मन
हुंदका आतच दाबतं

विचार भावनेचा संगम
तिथे नाविन्याचा उगम
कविता जरी शब्दांची गुंफण
तेच खरे कवीचे चिंतन...

कवी : राहुल दादा बिचकुले
माणकोबावाडा, यवत, ता. दौंड, जि. पुणे

रविवार, १७ एप्रिल, २०२२

विचार - जिवनात अपयश आले तरी

जिवनात अपयश आले तरी 
खचुन जावु नका...!
पुन्हा उभे रहा
प्रयत्न करत रहा...!
कारण
अपयशाच्या पायऱ्या 
आपल्याला मजबुत बनवतात
आणि यशाच्या शिखरावर 
पोहचण्यासाठीचे बळ देत असतात...!

कवी : राहुल दादा बिचकुले

हि वाट कुठे जाते

हि वाट कुठं जाते

जिवन एक प्रवास आहे
इथं फक्त चालायचं असतं
जाता येता ईचारपुस करीत
नवं नातं फुलवायचं असतं

चांगलं वाईट समजून घेत
पुढं पुढं चालायचं असतं
एक मात्र लक्षात ठेवायचं
हि वाट कुठं जाते 
हे मात्र ईचारायचं असतं

नवख्या वाटेने जाताना
कधी डगमगायचं नसतं 
मनाला विचारून 
पुढं पुढं चालायचं असतं 

अनुभावाची शिदोरी घेत
प्रवासात आनंदी राहायचं असतं
ध्येय मनाशी ठेवून
हि वाट कुठं नेईल
हे मात्र लक्षात ठेवायचं असतं

हि वाट कुठं जाते
हे जो समजुन घेतो
एकदा वाट सापडली कि
तो आयुष्यात यशस्वी होतो

प्रवास करत रहा
वाटा समजुन येतील
ध्येय मनाशी ठेवा
हि वाट कुठं जाते
हेही समजुन जाईल

कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.



नको जगण्याचा तिरस्कार करू

नको जगण्याचा
तिरस्कार करू
माणसा अर्धवट सोडुन जगणं
नको असा रे तु मरू

जीवन देवाजीची देणं
सजीव आहे पुण्यवान
जन्म जरी तुझा झाला
येईल एक दिवस मरण

मरण निश्चितच आहे
कधी येईल सांगता येत नाही
कंटाळू नकोस जगण्याला
मरणासाठी करू नको काहीबाही

ज्याने जन्म दिला
तोच नेईल तुला
कर्तव्य गाजव या पृथ्वीवर
नाही पुन्हा तु या जन्माला

जगण्याची हि लढाई
लढावीच लागेल तुला
मन नको कमकुवत
जे त्यागील जीवाला

जगण्याचे मार्ग अनेक
नको शोधु या पळवाटा
ठाम रहा या रणांगणी
पर्याय शोध जगण्याला

आत्महत्या आत्मघात
हे शोभत नाही तुला
सतत सावरत रहा मनाला
जिंकून दाखव या जगण्याच्या लढाईला
जिंकुन दाखव या जगण्याच्या लढाईला

कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...