ऑनलाइनचा जमाना आला
आणि माणुसच बदलून गेला
पूर्वी तोंडभरून बोलायचा
आवर्जून भेटायचा
पण हल्ली बदल झाला फार
भेटणं, बोलणं राहिलं बाजुला
व्यक्त होण्यासाठी फक्त चित्राचा वापर
विज्ञानाने प्रगती केली
आणि माणुसकी कमी झाली
साध्या मोबाईलचं परिवर्तन
अँड्रॉईड फोनमध्ये झालं
कॉलिंग झालं कमी
आणि चॅटिंग आलं
कोण कोणाशी गप्पा मारतोय
हे कळेना झालंय
मनातील भावना व्यक्त करणं
यासाठीसुद्धा चित्र आलंय
स्टेट्स मूड सांगतो
हॅप्पी का अनहॅपी
पण प्रत्यक्षात मात्र वेगळं असतं
जसं दिसतं तसं नसतं
जरी असलं दुःख
तरी मनात दाबलं जातं
उगाच आणलेलं आनंदाचं आव
मात्र ओसंडून वाहतं
हे सोशल मीडिया
खुपच सोशल आहे
समोरच्याला भावनिक बनवता येतं
इतकं स्पेशल आहे
आपण कसेही असेना
पण सगळं काही सुंदर दाखवता येतं
मनातले डावपेच मनात दाबुन
समोरच्याला गंडवताही येतं
खोटं तर खुप बोललं जातं
इमोजी दाखवून भावनिकही होता येतं
असा आहे हा ऑनलाइनचा जमाना
कुणी कुणाला भेटेना
भेटणं राहिलं दूर
दोन शब्द सुद्धा बोलेना
शेजारी बसलं तरी
मोबाईल मध्ये पाहतय
काही विचारलं तरी
न पाहता होकार देतंय
चॅटिंग द्वारे बोलतंय
व्हिडीओ कॉलद्वारे पाहतय
जवळ आल्यावर मात्र
लांबुनच जातंय
असला कसला ह्यो जमाना आलाय
आणि माणुसच ऑनलाइन झालाय
ऑनलाइनच्या दुनियेत मात्र
विज्ञानाने कमाल केली
माणसाची माणुसकी मात्र
इथे सारी कमी झाली…
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी