शेवटी ज्याचं त्याच्यापाशी
पण विचार करावा मनाशी
काय वागतो आपण
का खेळ निसर्गाशी…!
काय कमी निसर्गानं केलं
नाही आपल्याला पोसलं
कुठं स्वार्थ साधला
तरी माणसा निसर्गावरी तु कोपला
करी पशु पक्षांची हत्या
वृक्ष कत्तल ही केली
जंगलं स्वार्थाने गिळली
माणसा तुझी बुरी नियत रे कसली
नको खेळ निसर्गाशी
नको परीक्षा निसर्ग संयमाची
होईल होत्याचं नव्हतं सारं
माणसा कर आता तरी विचार
माणसा थोडं घे तु मनावर
निसर्ग संवर्धन रुजव विचार
लावूनी झाडं वाचव निसर्गाला
नाहीतर माणसा नाही वाचवू शकणार स्वतःला
निसर्ग ताकद अफाट
नाही आपल्याला पेलणार
करू मैत्री निसर्गाशी
माणसा बरसात होईल सुखाची
शेवटी ज्याचं त्याच्यापाशी
करावी मैत्री वृक्षांशी
जबाबदारी घ्यावी निसर्ग संवर्धनाची
फक्त नको खेळ निसर्गाशी
नको खेळ निसर्गाशी…!
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी