विज्ञानाने प्रगती केली, आपण आधुनिकतेची कास धरली बेस केलं गड्या… प्रगती झालीच पाहिजे, काळानुसार बदललं पाहिजे पण प्रगतीचे नवे पंख घेऊन उंच यशाच्या क्षितिजावर विहार करत असताना जिथून झेप घेतली आहे ना त्या मातीला कधी विसरायचं नसतं… कारण शेवटी तिथच पुन्हा उतरायचं असतं…!
असो, सध्या जिकडेतिकडे पाहावे तिथे डोंगर, वनविभाग, गायरान असे अनेक राखीव, पडीक जंगलाचे भाग तिथे वणवे लागताना आपण पहात आहे..
पूर्वी गोष्टीत आणि पुस्तकातून वाचलं ऐकलं होतं जंगलात झाडांच्या फांद्यांना फांद्या घासुन घर्षण निर्माण होऊन वणवे लागायचे आणि त्यामुळे जंगल जळायचे… पण आता मला सांगा सध्याचे वणवे लागताना दिसत आहे तिथं झाड ना झुडुप दिसेना तरी कसे बरं वणवे लागतात. हे निसर्गनिर्मित वणवे नसुन माणसांचं वाईट विचारांचं कुटील कारस्थान असावं…
माणसालाच दोष का असं कुणी म्हणलं तर त्यानं बी समजुन जायचं की आग लावण्याएव्हढा माणसापेक्षा हुशार प्राणी दुसरा कोण नाही.
एकीकडे हजारो निसर्गप्रेमी अपार मेहनत करून आपली वसुंधरा हरित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकीकडे असे विघ्नसंतोषी महाभाग निसर्ग चक्रात अडथळे निर्माण करत आहेत. त्यांनी थोडंस समजुन घ्यावं कि आपण काय करतोय…
एक उघडा बोडका गवताने भरलेला डोंगर जरी वणव्यामध्ये जळाला ना तरी हजारो पक्षी, सरपटणारे प्राणी, असंख्य जीव ( किडे मुंग्या) यांची घरे आपण जाळतो. आज त्यांची घरे आपण जाळली तर उद्या भविष्यात निसर्ग आपले घर नक्कीच जाळेलं. हे नक्की ध्यानात ठेवा…
आज आपण निसर्गाचा ठेवा नष्ठ करत आहोत म्हणजे उद्याचे भविष्य जाळत आहे.
एकीकडे विद्युत दिव्यांनी झगमगणारी शहरे आणि त्यालगत असणारे जळजळीत निखाऱ्याने जळत असणारे डोंगर, जंगले. या दिव्यांच्या झगमगाटाची माणसाला इतकी सवय लागावी कि, त्याच्यापुढे त्याला जळत असणारे आपले भवितव्य दिसु नये. आज प्रत्येकाने निसर्गसंवर्धनासाठी प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. कारण आज सिमेंटच्या जंगलाने आपले जे अस्तित्व निर्माण केले आहे त्यामुळे निसर्गाला धोका निर्माण झाला आहे. युवा पिढीने पुढाकार घेऊन गावोगावी निसर्ग संवर्धन मोहीम सुरु करावी. त्या माध्यमातुन वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, पाणी आडवा, पाणी जिरवा मोहीम आणि असे अचानक जंगलात लागलेल्या किंवा लावलेल्या आगीपासून जंगलांचे, निसर्ग सृष्टीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आणि निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या विघ्नसंतोषी माणसांनाही धडा शिकवणे गरजेचे आहे.
आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असणारी गिरिशिखरे आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची साक्ष आहे. कित्येक पावले या भूमीवरून कडेकपारीतून धावली असतील, कित्येकांचे रक्ताचा अभिषेक या भूमीवर झाला असेल, कित्येक जुलमी राजवटी या नेस्तनाबुत केलेल्या या भूमीने गीरीशिखारांनी पहिल्या असतील. आपले स्वराज्य याच गीरीशिखारांच्या, डोंगर दऱ्यांच्या सामर्थ्यामुळे निर्माण झाले. हाच तो आपला भुतकाळ किती सुंदर होता. आणि आपल्या पूर्वजांनी कसा जपला होता हे आपण इतिहासाच्या पानोपानी पाहिलेले आहे. मग आपण का एव्हढे थंड रक्ताचे ?
का सळसळत नाही, का उसळत नाही आपले रक्त, आपले भविष्य डोळ्यासमोर जळत असताना …!
आतातरी जागे व्हा ..!
दिसता निसर्गावरी संकट
मावळ्यांनो धावुन जा
कोणी करत असेल जाणूनबुजून
त्यांना सोडू नका
पाहवत नाही या डोळ्यांना
भविष्य डोळ्यासमोर जळतांना
उफाळून येऊद्या रक्त
विषय निसर्गाचा असतांना
वणवा हा वणवा नव्हे
निसर्ग सृष्टी त्यात जळत आहे
आपण त्याच माईची लेकरे
कसे फक्त पहात रहातो
आणि माय डोळ्यासमोर मरत आहे
आता असे होऊ देऊ नका
असे भविष्य डोळ्यासमोर
जळताना पाहू नका ….!
आतातरी जागे व्हा ..!
दिसता निसर्गावरी संकट
मावळ्यांनो धावुन जा
कोणी करत असेल जाणूनबुजून
त्यांना सोडू नका
पाहवत नाही या डोळ्यांना
भविष्य डोळ्यासमोर जळतांना
उफाळून येऊद्या रक्त
विषय निसर्गाचा असतांना
वणवा हा वणवा नव्हे
निसर्ग सृष्टी त्यात जळत आहे
आपण त्याच माईची लेकरे
कसे फक्त पहात रहातो
आणि माय डोळ्यासमोर मरत आहे
आता असे होऊ देऊ नका
असे भविष्य डोळ्यासमोर
जळताना पाहू नका ….!
सर्व निसर्गप्रेमी मित्र मैत्रींनीना विनंती आहे कि, गावोगावी आपले निसर्ग संवर्धनासाठी एक मजबुत संघटन निर्माण करा. आणि त्यांमाध्यमातुन निसर्गसंवर्धन करा. हि भविष्याची गरज आहे. नाहीतर जंगल, निसर्ग, पशु, पक्षी हे आपल्या पुढच्या पिढीला फक्त चित्रात पाहावे लागेल. ते सुद्धा पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन. अंगावर सतत कृत्रिम सावली धरून....

लेखक / कवी : राहुल दादा बिचकुले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी