रविवार, २६ डिसेंबर, २०२१

शेतकरी समजुन घ्यायचा आसल ना

 शेतकरी समजुन घ्यायचा आसल ना

तर रानात राबावं लागतं
उन्हातान्हात काम करून
घामाचं टिपूस गाळावं लागतं
उगाच नाही म्हणत
जगाचा पोशिंदा
दिस उजाडत नाही म्हणुन
कुस बदलतो कितींदा
उन्हात काम करताना
पाय पोळतं
पाण्यातून चालताना
काटं बोचतं
इचुकाटे किती तुडवत असेल
याचं त्याला भान नाही
स्वतःपरीस पिक मोलाचं
कारण कठोर त्याच मन नाही
शेतकरी हळव्या मनाचा
रानातलं घाईच काम
जोवर होत नाही
तोवर भाकरीचा घास
घशाखाली जात नाही
रात दिस त्याला सारखीच असते
तसा उन्हाळा पावसाळाही सारखाच
उन्हाळ्यात पिक जळतं
पावसाळ्यात पाण्याखाली जातं
चिंता काही मिटत नाही
कष्ट फार करतो
पण डोईवरचं कर्जाच ओझं
काही केल्या फिटत नाही
स्वतःबरोबर आख्या संसाराला
आशेला लावतो
चांगल्या दिसणाऱ्या पिकासाठी
जवळच्या धनाचा जुगार लावतो
नाहीच बसला डाव तर
जीवही पणाला लावतो
मातीला माय म्हणतो
रात दिस सेवा करतो
डोईवरचं ओझं उतरत नाही म्हणून
काळ्या आईला सावकाराच्या घशात घालतो
आता हाती काही उरत नाही
माय असताना सोबतीला
संसारात काही पुरत नाही
जरी असला जगाचा पोशिंदा
तरी जग विचार करत नाही
संकटाशी दोन हात करणारा
डोईवरच्या ओझ्याखाली दबला जातो
जवळ राहत नाही काही
म्हणुन तो शेतकरी ठरत नाही
आता बोलणार कुणाला
म्हणुन तो अबोलच राहतो…


कवी - राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...