पाणी पाणी करुनी
व्याकुळ झाली धरणी
कंठ सुकला तहान लागली
काहीतरी कर माणसा
वसुंधरा तुला करिते विनवणी…!
पाणी आहे जीवन
निसर्गाची अनमोल देन
जागोजागी त्याला अडवुनी
मुरव मातीत त्याला माणसा
वसुंधरा तुला करिते विनवणी …!
नाही आज जागा तु झाला
मुकशील भविष्यात पाण्याच्या घोटाला
मग पैसा असुनी नाही मिळणार पाणी
घे ध्यानात आताच माणसा
वसुंधरा तुला करिते विनवणी …!
साद वसुंधरेची आज ऐकशील
जागोजागी पाणी अडवुन मुरवशील
कमी पडणार नाही कधी कशाची
हे घे ध्यानात माणसा
वसुंधरा तुला करिते विनवणी….!

कवी. राहुल दादा बिचकुले
संपादक : माझीलेखणी.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी