नुकताच होळीचा सन साजरा करुन रामा धनगर मेंढरांचा वाडा घेऊन कोकनातुन देसाला (घाटावर) निगाला व्ह्ता, वाढत्या शहरीकरनाचा परीनाम जानवतोय वाडा घाट चढुन वर निघाला. असाच यक दिवस वळवाचा पाऊस पडत व्हता मानसं भिजल्याली, गारा आण वारा जितराबं आण मानसाला झोडपतोय, चुल पेटली नाय, कुत्री आणी मानसं चिखलात ठोकल्याल्या पालात जिव दडवुन बसल्यात अशातच मांग रामुशाच्या गड्यांनी घात केला आण रामाची 22 मेंढरं आण 3 बालिंग रामुशांनी पळावलं, सकाळ दिवस ऊगावता रामा झाली घटना सांगायला न्याय मागायला गावात पाटलाचा वाडा हुडकत जातो, पाटलाच्या वाड्याव कारखान्याच्या निवडनुकीची वली पार्टी चालु हाय, मटनाचं टोप शिजत हायतं , जिवापाड जपल्याल्या म्होरप्या भिंगार्या बालिंग्याचं काताडं वाड्याच्या तुळईला लोंबताना रामाला दिसलं, रामा धाय मोकलुन रडाय लागला, रामा तसाच माघारी फिरतो बिर्हाडाव जातो कालच घासुन ठेवल्याली कुर्हाड घेऊन परत पाटलाच्या वाड्यात जातो दारु पिऊन मटान खात झिंगलेला पाटील दात कोरत झोपाळ्यावर पुढची योजना बनवत असतो. पाटील मिशीवर ताव देऊन रामाकडं बघनार तोच रामाची कुर्हाड पाटलाचं मस्ताक ऊडवुन पाटलाचं गरम रगात प्यायली आहे. पाटलाचा देह तसाच फडफडत झोपाळ्यावर पडलाय, रामाला केल्या कामाचा अजीबात पस्तावा नाय, रामा वाट बघतोय कुठं अंन्याय होतोय याची.

दिवे ता.पुरंदर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी